शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मराठा मोर्चामुळे सीमालढ्यास बळ

By admin | Updated: October 11, 2016 00:54 IST

दीपक दळवी : कर्नाटकातून तीस हजार सीमावासीय मोर्चात

कोल्हापूर : धडकी भरविणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर सीमाभागातील मराठा समाजबांधवांना एक स्फूर्ती मिळाली आहे. साठ वर्षे चाललेल्या सीमालढ्यास या मोर्चामुळे पाठबळ मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील तीस हजार मराठा बांधव येत्या शनिवारी कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होतील. कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी दसरा चौक येथील सकल मराठा समाजास पाठिंबा दिला. दळवी म्हणाले, ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे, त्याप्रमाणे सरकारला मराठा आरक्षण द्यावे लागेल. या मोर्चासाठी बेळगावमधून किमान तीस हजार मराठाबांधव येतील. यासह बेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. आम्ही सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊ. तेथून शिवाजी विद्यापीठमार्गे ताराराणी चौकात सामील होऊ. या मोर्चात आमच्या सीमालढ्याचे फलक असणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा समाजात जागृतीचे काम सुरू होते. आता मराठा मूक मोर्चाच्या रूपातून पुन्हा एकदा ताकद दिसून आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सीमालढा न्यायमार्गाने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चाच्यावतीने शनिवारी राज्य शासनाला जे मागण्यांचे निवेदन केले जाणार आहे, त्यामध्ये सीमाप्रश्न सोडविण्याच्याही मागणीचा उल्लेख करा, असे निवेदन वसंत मुळीक यांना दिले. मधल्या काळात सीमाभागात मराठा समाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र होते; पण पुन्हा या एकीमुळे सर्व मराठा समाजबांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे. यावेळी समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समिती अध्यक्ष नागोजी हुद्दार, मराठा समाज सुधारणा समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ८६५ गावचे लोकबेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊन नंतर कोल्हापूरकडे रवाना होणार