शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

मराठा मोर्चामुळे सीमालढ्यास बळ

By admin | Updated: October 11, 2016 00:54 IST

दीपक दळवी : कर्नाटकातून तीस हजार सीमावासीय मोर्चात

कोल्हापूर : धडकी भरविणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर सीमाभागातील मराठा समाजबांधवांना एक स्फूर्ती मिळाली आहे. साठ वर्षे चाललेल्या सीमालढ्यास या मोर्चामुळे पाठबळ मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील तीस हजार मराठा बांधव येत्या शनिवारी कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होतील. कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी दसरा चौक येथील सकल मराठा समाजास पाठिंबा दिला. दळवी म्हणाले, ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे, त्याप्रमाणे सरकारला मराठा आरक्षण द्यावे लागेल. या मोर्चासाठी बेळगावमधून किमान तीस हजार मराठाबांधव येतील. यासह बेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. आम्ही सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊ. तेथून शिवाजी विद्यापीठमार्गे ताराराणी चौकात सामील होऊ. या मोर्चात आमच्या सीमालढ्याचे फलक असणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा समाजात जागृतीचे काम सुरू होते. आता मराठा मूक मोर्चाच्या रूपातून पुन्हा एकदा ताकद दिसून आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सीमालढा न्यायमार्गाने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चाच्यावतीने शनिवारी राज्य शासनाला जे मागण्यांचे निवेदन केले जाणार आहे, त्यामध्ये सीमाप्रश्न सोडविण्याच्याही मागणीचा उल्लेख करा, असे निवेदन वसंत मुळीक यांना दिले. मधल्या काळात सीमाभागात मराठा समाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र होते; पण पुन्हा या एकीमुळे सर्व मराठा समाजबांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे. यावेळी समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समिती अध्यक्ष नागोजी हुद्दार, मराठा समाज सुधारणा समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ८६५ गावचे लोकबेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊन नंतर कोल्हापूरकडे रवाना होणार