शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

मराठा मोर्चामुळे सीमालढ्यास बळ

By admin | Updated: October 11, 2016 00:54 IST

दीपक दळवी : कर्नाटकातून तीस हजार सीमावासीय मोर्चात

कोल्हापूर : धडकी भरविणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर सीमाभागातील मराठा समाजबांधवांना एक स्फूर्ती मिळाली आहे. साठ वर्षे चाललेल्या सीमालढ्यास या मोर्चामुळे पाठबळ मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील तीस हजार मराठा बांधव येत्या शनिवारी कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होतील. कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी दसरा चौक येथील सकल मराठा समाजास पाठिंबा दिला. दळवी म्हणाले, ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी एकवटलेला आहे, त्याप्रमाणे सरकारला मराठा आरक्षण द्यावे लागेल. या मोर्चासाठी बेळगावमधून किमान तीस हजार मराठाबांधव येतील. यासह बेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. आम्ही सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊ. तेथून शिवाजी विद्यापीठमार्गे ताराराणी चौकात सामील होऊ. या मोर्चात आमच्या सीमालढ्याचे फलक असणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठा समाजात जागृतीचे काम सुरू होते. आता मराठा मूक मोर्चाच्या रूपातून पुन्हा एकदा ताकद दिसून आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे सीमालढा न्यायमार्गाने सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चाच्यावतीने शनिवारी राज्य शासनाला जे मागण्यांचे निवेदन केले जाणार आहे, त्यामध्ये सीमाप्रश्न सोडविण्याच्याही मागणीचा उल्लेख करा, असे निवेदन वसंत मुळीक यांना दिले. मधल्या काळात सीमाभागात मराठा समाज वाऱ्यावर सोडल्याचे चित्र होते; पण पुन्हा या एकीमुळे सर्व मराठा समाजबांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे. यावेळी समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, तालुका समिती अध्यक्ष नागोजी हुद्दार, मराठा समाज सुधारणा समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ८६५ गावचे लोकबेळगावच्या ४० किलोमीटरच्या परीघ परिसरातील ८६५ गावांमधून बांधव येणार आहेत. सर्व मराठाबांधव खानापूर येथे त्या दिवशी एकत्र येऊन नंतर कोल्हापूरकडे रवाना होणार