शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

इचलकरंजीत कर्मचाऱ्यांचे काम बंद

By admin | Updated: December 29, 2015 01:04 IST

नगरपालिकेत आंदोलन : नोव्हेंबरचा पगार न मिळाल्याने निषेध, घोषणाबाजी

इचलकरंजी : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्याने सोमवारी काम बंद आंदोलन केले. सकाळी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमून प्रवेशद्वार बंद केले. यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पगार देण्यास मंजुरी मिळाल्यावर त्वरित पगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कामगारांनी खात्यावर पगार जमा होईपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. कर्मचाऱ्यांना अलीकडे प्रत्येक महिन्याला पगारासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा लागत आहे. पाठपुरावा करूनही नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्याने सोमवारी संतप्त झालेले कर्मचारी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करीत मुख्य प्रवेशद्वारात जमले. प्रवेशद्वार बंद करून कामगार लोकप्रतिनिधी, नागरिकांना पालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी वेळेवर पगार न देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी, शासनाकडून पगारासाठी निधी आला आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. मंजुरीनंतर त्वरित पगार देण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. मात्र, कामगार नेत्यांनी प्रत्येक महिन्याला ही अडचण असून, कायमस्वरूपी १ तारखेला पगार होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. तसेच नोव्हेंबरचा पगार खात्यावर जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. पगाराबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी रसाळ कोल्हापूरला रवाना झाले. दरम्यान, रात्री उशिरा मुख्याधिकाऱ्यांना धनादेश प्राप्त झाला असून, आज, मंगळवारी पगार होणार असल्याचे मुख्याधिकारी रसाळ यांनी सांगितले. आंदोलनात कामगार नेते ए. बी. पाटील, संभाजी काटकर, शंकर अगसर, हरी माळी, अण्णासाहेब कागले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले. (वार्ताहर)कामकाज ठप्प : नागरिक मात्र त्रस्तपगारासाठी कामगारांच्या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. चार दिवसांच्या सलग सुटीनंतर सोमवारी पालिका सुरू झाली. त्यामुळे तटलेली कामे करण्यासाठी नागरिक नगरपालिकेत येत होते. मात्र, काम बंद आंदोलनामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. या गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त होऊन संताप व्यक्त करताना दिसत होते.