शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

थेट पाईपलाईनचे काम रोखले

By admin | Updated: January 13, 2016 01:24 IST

ठिकपुर्लीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : शेतकऱ्यांना भरपाई द्या, ४४ गावांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी

राशिवडे : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे सुरू असलेले थेट पाईपलाईनचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी बंद पाडले. राधानगरी तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुर्नवसन, चर खुदाई करताना पडणारा भराव यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, तर थेट पाईपलाईनला गळती लागल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? ‘थेब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत दिडशेवर कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईनचे काम मंगळवारी दुपारी चार वाजता बंद पाडले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, पंचायत समिती सदस्य अजित पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, शहराला शुद्ध पाणी पुरविण्याच्या विरोधात आम्ही नाही मात्र एकीकडे शहराला शुद्ध पाणी आणि खेड्यांना मैला, मळी मिश्रित पाणी का प्यायचे? ज्यांनी आपले संसार धरणात बुडविले त्यांचे पुर्नवसन अद्यापही झालेले नाही. त्यांच्यावर पुर्नवसनाचे भिजत घोंगडे शासन दरबारी असताना पुन्हा पाईपलाईनच्या चर खुदाईच्या कामामुळे पंधरा फूट उंच भरावा पडत आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके रस्त्यावर आणायची कशी? पाईपलाईनला गळती लागून शेतकऱ्यांची जमीन नापिक होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले. अजित पोवार म्हणाले, राधानगरी पंचायत समितीने या थेट पाईपलाईन योजनेस विरोध करून ठराव महापालिकेकडे पाठविला होता. मात्र, या ठरावाला महानगरपालिकेने केराची टोपली दाखविली. राधानगरी तालुक्यांनी २६ गावे व करवीर तालुक्यांतील १८ गावांतून ही थेट पाईपलाईन जाणार असून, या गावांनाही या योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. ज्यांच्या पाईप फुटलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीला महापालिकेने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. यावेळी जनार्दन पाटील वासुदेव पाटील यांची भाषणे झाली.या अंदोलनात भीमराव गोणुगडे, राधानगरी तालुका अध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुका अध्यक्ष, डॉ. बाळासाहेब पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष नितीन पोवार, शारदा कोईगडे, आण्णाप्पा चौगले, शरद मुसळे, तानाजी पाटील, शंकर पाटील, आण्णा खेबुडकर, शंकर पाटील, नीलेश महडेश्वर, आनंदा गारे, शिवाजी पाटील, शंकर कांबळे, शामराव टेपुगडे, डी. जी. चौगले, राजेंद्र पाटील, शंकर जाधव, विश्वास पाटील, सात्ताप्पा पाटील, संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याची तीव्रता पाहून ठेकेदारांनी तत्काळ काम बंद करून, यंत्र सामुग्रीसह वाहणे अन्यत्र हलविली. न्याय मिळेपर्यंत काम सुरू करू नय,े अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. (प्रतिनिधी)