शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

थेट पाईपलाईनचे काम रोखले

By admin | Updated: January 13, 2016 01:24 IST

ठिकपुर्लीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : शेतकऱ्यांना भरपाई द्या, ४४ गावांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी

राशिवडे : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे सुरू असलेले थेट पाईपलाईनचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी बंद पाडले. राधानगरी तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुर्नवसन, चर खुदाई करताना पडणारा भराव यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, तर थेट पाईपलाईनला गळती लागल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? ‘थेब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत दिडशेवर कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईनचे काम मंगळवारी दुपारी चार वाजता बंद पाडले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, पंचायत समिती सदस्य अजित पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, शहराला शुद्ध पाणी पुरविण्याच्या विरोधात आम्ही नाही मात्र एकीकडे शहराला शुद्ध पाणी आणि खेड्यांना मैला, मळी मिश्रित पाणी का प्यायचे? ज्यांनी आपले संसार धरणात बुडविले त्यांचे पुर्नवसन अद्यापही झालेले नाही. त्यांच्यावर पुर्नवसनाचे भिजत घोंगडे शासन दरबारी असताना पुन्हा पाईपलाईनच्या चर खुदाईच्या कामामुळे पंधरा फूट उंच भरावा पडत आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके रस्त्यावर आणायची कशी? पाईपलाईनला गळती लागून शेतकऱ्यांची जमीन नापिक होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले. अजित पोवार म्हणाले, राधानगरी पंचायत समितीने या थेट पाईपलाईन योजनेस विरोध करून ठराव महापालिकेकडे पाठविला होता. मात्र, या ठरावाला महानगरपालिकेने केराची टोपली दाखविली. राधानगरी तालुक्यांनी २६ गावे व करवीर तालुक्यांतील १८ गावांतून ही थेट पाईपलाईन जाणार असून, या गावांनाही या योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. ज्यांच्या पाईप फुटलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीला महापालिकेने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. यावेळी जनार्दन पाटील वासुदेव पाटील यांची भाषणे झाली.या अंदोलनात भीमराव गोणुगडे, राधानगरी तालुका अध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुका अध्यक्ष, डॉ. बाळासाहेब पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष नितीन पोवार, शारदा कोईगडे, आण्णाप्पा चौगले, शरद मुसळे, तानाजी पाटील, शंकर पाटील, आण्णा खेबुडकर, शंकर पाटील, नीलेश महडेश्वर, आनंदा गारे, शिवाजी पाटील, शंकर कांबळे, शामराव टेपुगडे, डी. जी. चौगले, राजेंद्र पाटील, शंकर जाधव, विश्वास पाटील, सात्ताप्पा पाटील, संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याची तीव्रता पाहून ठेकेदारांनी तत्काळ काम बंद करून, यंत्र सामुग्रीसह वाहणे अन्यत्र हलविली. न्याय मिळेपर्यंत काम सुरू करू नय,े अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. (प्रतिनिधी)