शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिवसेनेचा मुरगूडमध्ये रास्ता रोको

By admin | Updated: March 3, 2015 22:47 IST

भूमिअधिग्रहण कायद्याला विरोध : कायद्याच्या प्रतींची केली होळी, घोषणांनी परिसर गेला दणाणून

मुरगूड : शेतकरी हाच राष्ट्राचा पोशिंदा आहे. त्याला अग्रक्रम देऊनच देशामध्ये शासनाने विविध निर्णय घेतले पाहिजेत; पण त्यांचा अजिबात विचार न करता, शेतकऱ्याला नेस्तनाबूत करण्यासाठीच केंद्र सरकारने भूमिअधिग्रहण कायदा संसदेत आणला आहे. कृषिविरोधी धोरणाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जमिनीवर आणू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. शासनाच्या निषेधार्थ निपाणी-राधानगरी हा रस्ता मुरगूड येथे रोखून धरत प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलनाने वाहतूक काही काळ ठप्प झाली. यावेळी विजय देवणे म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ब्रिटिशांपेक्षाही कडक कायदे करण्याचा सपाटा लावला आहे. आठ एकरांपेक्षा जास्त जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या उद्योगधंद्याच्या नावाखाली बड्याबड्या धेंडांना विनामोबदला देण्याचाच डाव सरकारचा आहे. मोजक्या उद्योजक व भांडवलदारांचे समर्थन जर हे सरकार करीत असेल, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करून रान उठवेल. मंगळवार मुरगूडचा बाजार असल्याने वाहनांची, चालक, व्यापाऱ्यांची काहीवेळ तारांबळ उडाली. रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणीच सभा घेऊन भूमिअधिग्रहण कायद्यांच्या प्रतींची होळी करण्यात आली. कागल तालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, जिल्हा महिला संघटक सुषमा चव्हाण, धोंडिराम परीट, आदींनी मनोगत व्यक्त केली. आंदोलनामध्ये तालुका महिला संघटक शोभा पाटणकर, उपजिल्हा महिला संघटक विद्या गिरी, नागेश आसबे, चंद्रशेखर पाटील, धनाजी धामणकर, प्रभाकर कांबळे, सागर मोहिते, शशी जाधव, दिग्विजय पाटील, निवृत्ती पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)