शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सांगली फाट्यावर रास्ता रोको

By admin | Updated: December 1, 2015 00:36 IST

‘सुप्रीम’विरोधात काँग्रेसचे आंदोलन : कोल्हापूर-सांगली रस्त्याचा दर्जा सुधारण्याची मागणी

शिरोली : कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जर रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारायला जमत नसेल, तर सुप्रीम कंपनीने काम सोडून चालते व्हावे, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने शशिकांत खवरे यांनी सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्याचे काम सुरू करावे आणि दर्जा सुधारावा म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरोली-सांगली फाटा जैन मंदिर येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते; पण तीन वर्षे उलटली तरी अद्याप पन्नास टक्के काम पूर्ण झालेले नाही. जे रस्त्याचे काम केले आहे, ते निकृष्ट दर्जाचे केले आहे, तर गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोमवारी (दि. २२) दिले होते; पण आठ दिवसांत कोणतेही काम सुप्रीम कंपनीने सुरू केले नाही, म्हणून अखेर सोमवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. अपूर्ण रस्त्याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजही रस्त्याचे काम अपुरे आहे. ड्रेनेजलाईन, संपूर्ण रस्त्यावरील पूल, मोहरी यांचे काम अजून अपूर्ण आहे, तर उर्वरित जो रस्ता केला आहे, त्याची लेवलच झालेली नाही. या रस्त्याचा दर्जा आणि पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास नेमले आहे; पण हा विभाग देखरेख करताना दिसतच नाही. त्यामुळे या रस्त्याला दर्जाच नाही.सुप्रीम कंपनीचे अधिकारी अशोक मोहिते यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ते म्हणाले, दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार आहे. काम सुरू होताच रस्त्याच्या कामाबाबत ज्या त्रुटी आहेत, त्या पूर्ण करू. तसेच वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे आश्वासन यावेळी मोहिते यांनी दिले. या आंदोलनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते शशिकांत खवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, जोतिराम पोर्लेकर, योगेश, सरदार मुल्ला, मुन्ना सनदे, उत्तम पाटील, राजू सुतार, महम्मद महात, मन्सूर नदाफ, दिलीप पाटील, दिलीप तेलवेकर, ईश्वर कोळी, सुरेश पाटील, महावीर गुमताज, राजू देसाई, अनिल कोळी, शिवाजी मोटे, संदीप घोरपडे, अभिजित पाटील, संजय सुतार, संतोष परब, सुधीर गावडे, अजिंक्य माने, कैलास नवले, बापू गुडे, गणेश जाधव, बाबासाहेब कांबळे, पप्पू नार्वेकर, वैभव केसरकर, शुभम आलाट, अभिजित खाडे, लखन बनसोडे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)जमत नसेल तर काम सोडा : शशिकांत खवरेकोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र, अजून पन्नास टक्के बाकी आहे. कंपनीने केवळ आडमुठेपणामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना वेठीस धरले आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. जर कंपनीला काम जमत नसेल, तर त्यांनी काम सोडून जावे, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खवरे यांनी यावेळी दिला.