शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भटक्या विमुक्त समाजातर्फे रास्ता रोको

By admin | Updated: April 1, 2015 00:33 IST

विविध मागण्यांकडे लक्ष : शासनाच्या विरोधात घोषणा, वाहतूक खोंळबली

कोल्हापूर : भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी माने, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यशवंतराव चव्हाण योजनेतील तरतुदीनुसार वर्षाला २० कुटुंबांच्या तीन वसाहती करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे चार वर्षांत १२ वसाहती निर्माण केल्या असत्या तर २४० कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असती. मात्र, समाजकल्याण आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे योजनेची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी अनेक गरीब भटक्या कुटुंबांना घरापासून वंचित राहावे लागले. त्याला समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी माने, समितीचे सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त गायकवाड जबाबदार आहेत. पारगांव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजातील गोपाळ समाजातील काही कुटुंबे घरासाठी पात्र आहेत. त्यांना त्वरीत जागा व घरे द्यावीत. टोप येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ गंगाराम नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नसलेल्या जागेत गोपाळ समाजातील २३ कुटुंंबे राहतात. या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी प्रस्ताव दिले आहेत. मात्र, ते प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. जाचक अट शिथील करून दाखले द्यावेत. निगवे दुमाला (ता. करवीर) येथे गोपाळ समाजाची ३२ कुटुंबे राहतात. शिरोली पुलाची येथील भूमीहिन २० कुटुंबे राहतात. वसगडे येथे गोपाळ, नंदीवाले समाजातील कुटुंबे आहेत. त्यातील प्रत्येक कुटुंबांला घरे द्यावीत. नागावातील गोपाळ समाजालाही जागा द्यावी आदी मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी येथील दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी संतप्त कार्यकर्ते प्रवेशद्वार ढकलून आवारात घुसण्याचा प्रयत्न केले. पोलिसांनी थोपवून ठेवले. जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळविली. निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. रमेश चांदणे, भारत धोंगडे, विकास कांबळे, आदिनाथ साठे, युवराज पोवार आदी मोर्चात सहभागी झाले होते.चौक दुमदुमला‘निम का पत्ता कडवा हैं, सरकार साला भडवा हैं’, ‘एक रुपयाला कडिपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, ‘निष्क्रिय राजाराम माने यांनी राजीनामा द्यावा’, ‘गलथान कारभार करणारे जिल्हा महसूल यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.