शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

भटक्या विमुक्त समाजातर्फे रास्ता रोको

By admin | Updated: April 1, 2015 00:33 IST

विविध मागण्यांकडे लक्ष : शासनाच्या विरोधात घोषणा, वाहतूक खोंळबली

कोल्हापूर : भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी माने, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यशवंतराव चव्हाण योजनेतील तरतुदीनुसार वर्षाला २० कुटुंबांच्या तीन वसाहती करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे चार वर्षांत १२ वसाहती निर्माण केल्या असत्या तर २४० कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असती. मात्र, समाजकल्याण आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे योजनेची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी अनेक गरीब भटक्या कुटुंबांना घरापासून वंचित राहावे लागले. त्याला समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी माने, समितीचे सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त गायकवाड जबाबदार आहेत. पारगांव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजातील गोपाळ समाजातील काही कुटुंबे घरासाठी पात्र आहेत. त्यांना त्वरीत जागा व घरे द्यावीत. टोप येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ गंगाराम नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नसलेल्या जागेत गोपाळ समाजातील २३ कुटुंंबे राहतात. या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी प्रस्ताव दिले आहेत. मात्र, ते प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. जाचक अट शिथील करून दाखले द्यावेत. निगवे दुमाला (ता. करवीर) येथे गोपाळ समाजाची ३२ कुटुंबे राहतात. शिरोली पुलाची येथील भूमीहिन २० कुटुंबे राहतात. वसगडे येथे गोपाळ, नंदीवाले समाजातील कुटुंबे आहेत. त्यातील प्रत्येक कुटुंबांला घरे द्यावीत. नागावातील गोपाळ समाजालाही जागा द्यावी आदी मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी येथील दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी संतप्त कार्यकर्ते प्रवेशद्वार ढकलून आवारात घुसण्याचा प्रयत्न केले. पोलिसांनी थोपवून ठेवले. जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळविली. निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. रमेश चांदणे, भारत धोंगडे, विकास कांबळे, आदिनाथ साठे, युवराज पोवार आदी मोर्चात सहभागी झाले होते.चौक दुमदुमला‘निम का पत्ता कडवा हैं, सरकार साला भडवा हैं’, ‘एक रुपयाला कडिपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, ‘निष्क्रिय राजाराम माने यांनी राजीनामा द्यावा’, ‘गलथान कारभार करणारे जिल्हा महसूल यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.