शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रेंदाळचा यंत्रमाग व्यवसाय बंदच

By admin | Updated: November 19, 2014 23:24 IST

यंत्रमाग उद्योगामध्ये चिंतेचे वातावरण : काही ठिकाणी केवळ एकाच पाळीत कारखाने सुरू

तानाजी घोरपडे =- हुपरी --दिवाळी सुटीमध्ये बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप कामावर परत आलेले नाहीत. अगोदरपासूनच असलेला कामगारांचा तुटवडा व त्यामध्येच कामगार संघटनांनी केलेला मजुरीवाढीचा प्रस्ताव रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनने गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवल्याने कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रेंदाळ व परिसरातील यंत्रमाग उद्योगामध्ये चिंतेचे व संभ्रमावस्थेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, केवळ एकाच पाळीत (दिवसपाळी) कारखाने सुरू राहिले आहेत.रेंदाळ व परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग चालविला जातो. याठिकाणी लालबावटा जनरल कामगार युनियन, जनरल लेबर युनियन व सर्व श्रमिक संघ अशा तीन कामगार संघटना कार्यरत आहेत. या तीनही कामगार संघटनांनी मिळून इचलकरंजीप्रमाणे ३६ पिकास ८३ पैसे मजुरी मिळावी, अशी मागणी एक वर्षांपूर्वी केली होती. मात्र रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनने ही मागणी अद्यापपर्यंत प्रलंबित ठेवली आहे. कामगार संघटनांनी केलेली मागणी व प्रत्यक्षात कामगारांना मिळणारी मजुरी यामध्ये प्रति पिकास पाच पैशांची तफावत आहे. याप्रश्नी निर्णयच घेण्यात आला नसल्यामुळे यंत्रमागधारक व कामगार यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी, कामगारांमध्ये नाराजी पसरली असून गेल्या अनेक वर्षांपासून मालक व कामगार यांच्यामध्ये असणाऱ्या ऋणानुबंधास यामुळे तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंत्रमाग उद्योगामध्ये आतापर्यंत निर्माण झालेल्या बऱ्या-वाईट अनेक प्रसंगावेळी दोघांमध्ये कधीही कटुता निर्माण झाल्याचा प्रसंग अनुभवण्यास मिळालेला नाही. प्रत्येकवेळी समन्वयाने मार्ग काढत दोघांनीही ऋणानुबंधाची वीण उसवू न देता एकमेकांना आधार देत ही वीण घट्ट करण्याचाच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे वेगळेच नाते निर्माण झाल्याचे पहावयास मिळत असताना यावेळी मात्र मजुरीवाढ प्रकरणामुळे या दोघांमध्ये कटूता निर्माण होण्याचा धोका संभवतो आहे. पूर्वीपासूनच या उद्योगामध्ये कामगारांचा तुटवडा असताना दिवाळी सुटीमध्ये बाहेरगावी गेलेले कामगारही अद्यापपर्यंत कामावर परत आलेले नाहीत. त्यामुळे बरेच कारखाने अजूनही बंद आहेत. तर काहींनी कामगारांची जुळवाजुळव करीत तर काहींनी स्वत:सह घरातील सदस्याला यंत्रमागावर उभे करून कारखाने सुरू केले आहेत. अशा प्रकारची उठाठेव करूनही केवळ दिवसपाळीमध्येच कारखाने सुरू राहिल्याचे पहावयास मिळत आहे.रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब तांबे म्हणाले, कामगार संघटनांनी केलेल्या मजुरीवाढीबाबत त्यांच्याशी वेळोवेळी सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांनी ३६ पिकास ८३ पैसे मजुरी मिळण्याची मागणी केली आहे. इचलकरंजी व आमच्यामध्ये पाच पैशांचा फरक आहे. त्यामध्ये बदल करून आम्ही त्यांना समाधानकारक वाढ देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच दिवाळीसाठी बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परत आलेले नाहीत.