शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गांधीनगर-वळीवडे रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वेंना थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST

गांधीनगर : गांधीनगर - वळीवडे रेल्वेस्थानकावर येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व रेल्वेचा थांबा करावा, अशी मागणी करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू ...

गांधीनगर : गांधीनगर - वळीवडे रेल्वेस्थानकावर येणाऱ्या - जाणाऱ्या सर्व रेल्वेचा थांबा करावा, अशी मागणी करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे स्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडिस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारी पेठ आहे. येथे बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांची तसेच कामगारांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर वळीवडे रेल्वेस्टेशनचा थांबा बंद केला होता. दरम्यान, सध्या सर्व व्यवहार सुरळीत असल्याने कर्मचारी वर्गाला इतर वाहनांनी ये-जा करणे परवडत नाही. त्यामुळे या रेल्वेस्टेशनवर रेल्वेंना थांबा द्यावा. यावेळी रेल्वेचे प्रबंधक फर्नांडिस यांनी याबाबत वरिष्ठांना कळवून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख दीपक पोपटानी, दिलीप सावंत, दीपक अंकल, शाखा प्रमुख सुनील पारपाणी, विनोद रोहिडा, किशोर कामरा, जितू चावला उपस्थित होते.

फोटो : २० गांधीनगर निवेदन

गांधीनगर- वळीवडे रेल्वेस्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांचा थांबा करावा, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे अधिकारी फर्नांडिस यांना देण्यात आले. यावेळी दीपक पोपटाणी, विनोद रोहिडा व शिवसैनिक उपस्थित होते.