शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

जीवन सुंदर बनवण्यासाठी ताणतणावापासून दूर रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST

चंदगड : प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्यांना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ...

चंदगड : प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्यांना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा मानसिक रुग्णालयातील डॉ .चारूशीला भास्कर यांनी केले.

अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, सेवा रुग्णालयाच्या वतीने ‘विद्यार्थी ताणतणाव व कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. चारूशीला भास्कर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील बोलत होते.

डॉ. चारूशीला म्हणाल्या, गेले वर्षभर आपण सर्वजण कोरोनाशी सामना करीत आहोत. कोरोनाची लस आता उपलब्ध असली तरीही अजून कोरोना संपलेला नाही. अनेक महिन्यांनंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थी तणावात आहेत. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यानी परीक्षेला सामोरे जाताना तणाव न घेता निर्भयपणे सामोरे जायला हवे. रोज प्राणायाम, फिरणे, सायकलिंग याबरोबरच पालेभाज्या, फळे असा चांगला आहार घेण्याचा सल्लाही डॉ. चारूशीला यांनी दिला. यावेळी डॉ. पूजा साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला व्ही. एन. सूर्यवंशी, एस. के. हरेर, एस. डी. पाटील, एस. के. पाटील, सी. डी. जोशी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी स्वागत केले. पी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर आर. व्ही. देसाई यांनी आभार मानले.

फोटो ओळी : अडकूर (ता. चंदगड) येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारूशीला भास्कर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.