शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

जीवन सुंदर बनवण्यासाठी ताणतणावापासून दूर रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST

चंदगड : प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्यांना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ...

चंदगड : प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. त्यांना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताणतणावापासून दूर राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा मानसिक रुग्णालयातील डॉ .चारूशीला भास्कर यांनी केले.

अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर, सेवा रुग्णालयाच्या वतीने ‘विद्यार्थी ताणतणाव व कोरोनासंदर्भात घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. चारूशीला भास्कर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील बोलत होते.

डॉ. चारूशीला म्हणाल्या, गेले वर्षभर आपण सर्वजण कोरोनाशी सामना करीत आहोत. कोरोनाची लस आता उपलब्ध असली तरीही अजून कोरोना संपलेला नाही. अनेक महिन्यांनंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थी तणावात आहेत. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यानी परीक्षेला सामोरे जाताना तणाव न घेता निर्भयपणे सामोरे जायला हवे. रोज प्राणायाम, फिरणे, सायकलिंग याबरोबरच पालेभाज्या, फळे असा चांगला आहार घेण्याचा सल्लाही डॉ. चारूशीला यांनी दिला. यावेळी डॉ. पूजा साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला व्ही. एन. सूर्यवंशी, एस. के. हरेर, एस. डी. पाटील, एस. के. पाटील, सी. डी. जोशी व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी स्वागत केले. पी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर आर. व्ही. देसाई यांनी आभार मानले.

फोटो ओळी : अडकूर (ता. चंदगड) येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चारूशीला भास्कर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.