शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता मोबाइलवर होणार शेती पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : शासन व शेतकरी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली पीक पाहणीची पारंपरिक पद्धत यापुढे ...

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : शासन व शेतकरी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली पीक पाहणीची पारंपरिक पद्धत यापुढे कालबाह्य होणार आहे. मोबाइलद्वारे शेतकऱ्यांना स्वत: आपल्या पिकांची नोंद करावी लागणार आहे. टाटा ट्रस्टने यासाठीचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून राज्य शासनाने त्यांचाशी करार केला आहे. स्थानिक पातळीवर तलाठी व कृषी सहायक यांच्यावर या कार्यवाहीची जबाबदारी दिली आहे. रविवार, १५ ऑगस्टपासून त्याची राज्यात सुरुवात होत आहे.

मोबाइलचा वापर वाढला असला तरीही सर्व शेतकऱ्यांना याचे पूर्ण ज्ञान आहे असे नाही. त्यामुळे अडचणी येणार आहेत. एका मोबाइलवरून वीस शेतकरी नोंद करू शकतात. मात्र, मोबाइल रेंज नाही. असा दुर्गम व ग्रामीण भाग मोठा आहे. मोबाइलद्वारे सुरू असलेल्या सध्याच्या अनेक योजनांचा बोजवारा उडालेला आहे. अशी याची गत होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतात केलेल्या पिकांची नोंद विविध कारणांसाठी आवश्यक असते. पीकनिहाय क्षेत्र, अपेक्षित उत्पादन यावर शासनाची शेतीविषयक धोरणे, कार्यक्रम, विविध योजना ठरत असतात. तलाठ्याकडील सात-बारा खात्यावर १२ नंबरच्या रकाण्यात याची नोंद असते. तलाठी दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून याबाबत माहिती घेऊन नोंद करत असत. गेल्या काही वर्षांत संगणक प्रणाली वापरात आली आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीने याची नोंद करणे क्लिष्ट ठरते. याशिवाय तलाठ्याकडील कामाचा बोजा वाढत असल्याने हे काम जिकिरीचे होते. १० सप्टेंबर २०१८ च्या निर्णयानुसार फेब्रुवारी २०१९ पासून याची प्रयोगिक तत्त्वावर काही तालुक्यांत सुरुवात करण्यात आली होती. यावर्षीपासून त्याची सर्व राज्यभर सुरुवात केली आहे. याची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी गाववार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभा राहून खरीप हंगामातील पिकाचा फोटो या अ‍ॅपवर पाठवायचा आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तलाठी व कृषी सहायक यातील १० टक्के नोंदींची पडताळणी करतील.

तज्ज्ञ तांत्रिक सल्लागार

टाटा सन्स यासाठी तांत्रिक सल्लागार आहेत. राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर त्यांच्याकडून विषय तज्ज्ञ, समन्वयक, प्रशिक्षक नेमण्यात येतील. विविध स्तरावर कार्यशाळा घेणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. महसूल व कृषी विभाग यांच्या सहभागातून वेगवेगळ्या समित्या नेमल्या जाणार आहेत.

एकच सांकेतिक अंक...

एका पिकासाठी राज्यभर एकच सांकेतिक अंक असेल. त्यामुळे नेमकी माहिती मिळेल. पीक विमा, आपतीतील नुकसान भरपाई, कृषी गणना, योजनांचा लाभ, आधारभूत किंमत ठरवणे, क्षेत्र व उत्पादनाचा अंदाज आदी बाबींसाठी याचा उपयोग होईल, असा शासनाचा दावा आहे.