शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

राज्यात आता मोबाइलवर होणार शेती पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:29 IST

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : शासन व शेतकरी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली पीक पाहणीची पारंपरिक पद्धत यापुढे ...

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : शासन व शेतकरी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली पीक पाहणीची पारंपरिक पद्धत यापुढे कालबाह्य होणार आहे. मोबाइलद्वारे शेतकऱ्यांना स्वत: आपल्या पिकांची नोंद करावी लागणार आहे. टाटा ट्रस्टने यासाठीचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून राज्य शासनाने त्यांचाशी करार केला आहे. स्थानिक पातळीवर तलाठी व कृषी सहायक यांच्यावर या कार्यवाहीची जबाबदारी दिली आहे. रविवार, १५ ऑगस्टपासून त्याची राज्यात सुरुवात होत आहे.

मोबाइलचा वापर वाढला असला तरीही सर्व शेतकऱ्यांना याचे पूर्ण ज्ञान आहे असे नाही. त्यामुळे अडचणी येणार आहेत. एका मोबाइलवरून वीस शेतकरी नोंद करू शकतात. मात्र, मोबाइल रेंज नाही. असा दुर्गम व ग्रामीण भाग मोठा आहे. मोबाइलद्वारे सुरू असलेल्या सध्याच्या अनेक योजनांचा बोजवारा उडालेला आहे. अशी याची गत होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेतात केलेल्या पिकांची नोंद विविध कारणांसाठी आवश्यक असते. पीकनिहाय क्षेत्र, अपेक्षित उत्पादन यावर शासनाची शेतीविषयक धोरणे, कार्यक्रम, विविध योजना ठरत असतात. तलाठ्याकडील सात-बारा खात्यावर १२ नंबरच्या रकाण्यात याची नोंद असते. तलाठी दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून याबाबत माहिती घेऊन नोंद करत असत. गेल्या काही वर्षांत संगणक प्रणाली वापरात आली आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीने याची नोंद करणे क्लिष्ट ठरते. याशिवाय तलाठ्याकडील कामाचा बोजा वाढत असल्याने हे काम जिकिरीचे होते. १० सप्टेंबर २०१८ च्या निर्णयानुसार फेब्रुवारी २०१९ पासून याची प्रयोगिक तत्त्वावर काही तालुक्यांत सुरुवात करण्यात आली होती. यावर्षीपासून त्याची सर्व राज्यभर सुरुवात केली आहे. याची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी गाववार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उभा राहून खरीप हंगामातील पिकाचा फोटो या अ‍ॅपवर पाठवायचा आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तलाठी व कृषी सहायक यातील १० टक्के नोंदींची पडताळणी करतील.

तज्ज्ञ तांत्रिक सल्लागार

टाटा सन्स यासाठी तांत्रिक सल्लागार आहेत. राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर त्यांच्याकडून विषय तज्ज्ञ, समन्वयक, प्रशिक्षक नेमण्यात येतील. विविध स्तरावर कार्यशाळा घेणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. महसूल व कृषी विभाग यांच्या सहभागातून वेगवेगळ्या समित्या नेमल्या जाणार आहेत.

एकच सांकेतिक अंक...

एका पिकासाठी राज्यभर एकच सांकेतिक अंक असेल. त्यामुळे नेमकी माहिती मिळेल. पीक विमा, आपतीतील नुकसान भरपाई, कृषी गणना, योजनांचा लाभ, आधारभूत किंमत ठरवणे, क्षेत्र व उत्पादनाचा अंदाज आदी बाबींसाठी याचा उपयोग होईल, असा शासनाचा दावा आहे.