शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ऊस उत्पादकांची अवस्था ‘ना घर का ना...’

By admin | Updated: October 13, 2015 00:06 IST

खर्च परवडेना : हंगाम उशिरा सुरू होण्याची चिन्हे

सुशांत घोरपडे -- म्हैसाळ--खतांच्या वाढणाऱ्या किमती, वातावरणातील बदल, सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे, शेतकऱ्याला मिळणारा कमी भाव आणि आता त्यातच साखरसम्राटांनीही दर निश्चित झाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा घेतलेला पवित्रा, या सर्व कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’अशी झाली आहे.मागील चार ते पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या एकीमुळे व शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला योग्य मोबदला द्यावा लागला व यातूनच अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.शेतकरी सुखी होतो न होतो तोपर्यंतच नवे सरकार आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते सत्ताधारी सरकारला मिळाल्याने आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाली कोण राहिलाच नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, अशी मागणी होत असताना, साखरसम्राटांनीही, एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी शासनाने कारखान्यांना मदत करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यार्षीचा गळीत हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला, तरी दर निश्चित झाले नाहीत. त्यातच अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे.अनेक निर्माण होणारी संकटे पाहता, आपला ऊस शिवारात तसाच वाळून तर जाणार नाही ना? या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. (वार्ताहर)खासदार आक्रमक होणार का ?शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जे लढले व शेतकऱ्यांच्या जिवावर खासदार पदापर्यंत पोहोचले, ते राजू शेट्टी आता सरकारविरोधात किती आक्रमक होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.