शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांची अवस्था ‘ना घर का ना...’

By admin | Updated: October 13, 2015 00:06 IST

खर्च परवडेना : हंगाम उशिरा सुरू होण्याची चिन्हे

सुशांत घोरपडे -- म्हैसाळ--खतांच्या वाढणाऱ्या किमती, वातावरणातील बदल, सरकारची शेतकऱ्यांबद्दलची धोरणे, शेतकऱ्याला मिळणारा कमी भाव आणि आता त्यातच साखरसम्राटांनीही दर निश्चित झाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा घेतलेला पवित्रा, या सर्व कारणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’अशी झाली आहे.मागील चार ते पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या एकीमुळे व शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला योग्य मोबदला द्यावा लागला व यातूनच अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.शेतकरी सुखी होतो न होतो तोपर्यंतच नवे सरकार आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते सत्ताधारी सरकारला मिळाल्याने आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाली कोण राहिलाच नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. शासनाच्या एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, अशी मागणी होत असताना, साखरसम्राटांनीही, एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी शासनाने कारखान्यांना मदत करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यार्षीचा गळीत हंगाम १५ दिवसांवर येऊन ठेपला, तरी दर निश्चित झाले नाहीत. त्यातच अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे.अनेक निर्माण होणारी संकटे पाहता, आपला ऊस शिवारात तसाच वाळून तर जाणार नाही ना? या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. (वार्ताहर)खासदार आक्रमक होणार का ?शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जे लढले व शेतकऱ्यांच्या जिवावर खासदार पदापर्यंत पोहोचले, ते राजू शेट्टी आता सरकारविरोधात किती आक्रमक होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.