शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

राज्यासाठी.... ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदविला. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले. ‘स्वाभिमानी’ने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.

केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके अमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. कोल्हापुरात तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. मुरगूड येथे त्यांनी राधानगरी ते निपाणी राज्यमार्ग राेखून धरला. कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनीही ‘बंद’ला पाठिंबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, आदी बाजारपेठांत दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोल पंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.

कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यांसह २० राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.

भाजी मंडई ओस

कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, गुळाचे सौदे बंद केले होते. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजी मंडया ओस पडल्या होत्या.

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल ठप्प झाली. दुधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल थांबली.

- राजाराम लोंढे