शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

नरके चुलत्या-पुतण्यांत अंतर्गत राजकीय समझोता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:37 IST

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके या चुलत्या-पुतण्यांमध्ये कमालीचा राजकीय समझोता आहे. लोकसभा निवडणुकीत ...

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके या चुलत्या-पुतण्यांमध्ये कमालीचा राजकीय समझोता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांची स्वतंत्र भूमिका असली, तरी त्याला विधानसभा व ‘गोकुळ’च्या राजकारणाची किनार आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकत्रितच काम करणार हे निश्चित आहे.डी. सी. नरके यांनी ‘कुंभी’ सोडून इतर राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नव्हता. अरुण नरके यांनी ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह जिल्हास्तरावरील राजकारण सांभाळले. डी. सी. नरके यांच्या पश्चातही आमदार चंद्रदीप नरके व अरुण नरके यांनी समझोत्यानुसारच राजकारणाची दिशा ठरविली. विधानसभा व साखर कारखाना आमदार नरके यांच्या, तर ‘गोकुळ’सह इतर राजकारण अरुण नरके यांच्यासोबत राहायचे, असा अलिखित समझोता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप नरके यांनी कॉँग्रेसच्या वतीने कळे जि.प.तून निवडणूक लढविल्यानंतर नरके कुटुंबात थोडा तणाव निर्माण झाला होता.गत लोकसभा निवडणुकीत आमदार नरके हे मंडलिक यांच्यासोबत, तर अरुण नरके हे महाडिक यांच्या पाठीशी होते. त्यावेळी ‘करवीर’मधून महाडिक यांना ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले व तेच मंडलिकांच्या पराभवास कारणीभूत ठरले. त्याची झळ आमदार नरके यांना सोसावी लागली. त्यात ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक, पी. एन. पाटील एकत्र आहेत. विधानसभेला ‘गोकुळ’च्या यंत्रणेचा आमदार नरके यांना त्रास होत असल्याने त्यांनी टार्गेट केले आहे. अरुण नरके हे सत्तारूढ गटाबरोबर असतानाही आमदार नरके यांनी ‘गोकुळ’च्या सभेत आक्रमक भूमिका घेतली. त्या रागापोटी महादेवराव महाडिक यांनी नरकेंना विधानसभेला पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा केली; त्यामुळे नरके अधिक आक्रमक झाले आहेत.आमदार नरके यांच्यादृष्टीने विधानसभा महत्त्वाची आहे, आता आक्रमकपणे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचले तर त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. मंडलिक यांना मताधिक्य देऊन ‘मातोश्री’वर वजन वाढविता येणार आहे. अरुण नरके व महादेवराव महाडिक यांची जुनी दोस्ती आहे. ‘गोकुळ’ राजकारणात महाडिक यांच्यासोबत, तर विधानसभेला आमदार नरके यांनाच साथ देणार हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केल्याने त्यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता कमी आहे.हात धरायचा नाही...!अरुण नरके यांनी मेळावा घेऊन महाडिक यांच्यामागे ताकद लावल्याने नरके गटात फूट पडल्याची चर्चा सुरू आहे; पण जिल्ह्यात कोणत्याच कुटुंबाअंतर्गत समझोता नसेल इतका नरके कुटुंबात आहे. कोणी कोठे थांबायचे आणि कोणाला कशी चाल द्यायची, याबाबत त्यांचा कोणी हात धरायचा नाही.