शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राज्य शासनाने नाट्यगृहांसाठी एकदाच ४०० कोटी द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्राला वेगळी परंपरा आहे. राज्यात ६३ नाट्यगृह असून, त्यांना एकाच छताखाली आणले पाहिजे. ही नाट्यगृह ...

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्राला वेगळी परंपरा आहे. राज्यात ६३ नाट्यगृह असून, त्यांना एकाच छताखाली आणले पाहिजे. ही नाट्यगृह सुस्थितीत ठेवण्यासाठी राज्य शासनाने एकदाच भरीव असा ४०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. या निधीतील व्याजातून नाट्यगृहांची देखभाल आणि नूतनीकरण करता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमु्ख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख नक्कीच याचा सकारात्मक विचार करतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकामध्ये प्रशांत दामले व कविता लाड यांच्यासोबत अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, राजसिंह देशमुख आदींच्या भूमिका आहेत. हे सुपरहिट नाटक प्रथमच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, कोल्हापुरात शनिवारी (दि. २०) दुपारी ४ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याचबरोबर शुक्रवारी (दि. १९) सातारा, रविवारी (दि. २१) सांगली आणि सोमवारी (दि. २२) कऱ्हाडमध्ये प्रयोग होणार आहेत. या नाटकानिमित्ताने दामले पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

दामले म्हणाले, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाला १७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रारंभ झाला. लवकरच नाटकाचा ४०० वा प्रयोग सादर होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही या नाटकाने हाऊसफुल्लची पाटी कायम ठेवली आहे. इम्तियाज पटेल यांच्या कथेवर हे नाटक आधारित आहे. संगीत अशोक पत्की यांनी दिले आहे. कोरोनामध्ये संकटात आलेले नाट्यक्षेत्र पुन्हा जोमाने सुरु होण्यासाठी विविध पातळीवर मदत होत आहे. नाट्यगृहांनी भाड्यात सवलत दिल्याने, टोल माफ केल्यामुळेच नाटक करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाजन पब्लिसिटीचे गिरीश महाजन उपस्थित होते.

चौकट

नुसता अभिनय चांगला असून चालत नाही. रंगभूमीवर प्रेम असावे लागते. नाट्य प्रयोगातू्न केवळ पैसे मिळवणे, हा उद्देश असता कामा नये. नाट्य चळवळ टिकली पाहिजे, असे दामले यांनी सांगितले. सुट्टीदिवशी प्रयोगांना गर्दी होते. मात्र, इतर दिवशी तोटा होणार, असे अपेक्षित ठेवूनच प्रयोग करत असल्याचेही ते म्हणाले.

फोटो : प्रशांत दामले यांचा वापरणे