शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:28 IST

जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजय पारकर - राधानगरीअभयारण्यातील काही लोभी कर्मचाऱ्यांमुळे वन्यजीव विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे. बाहेरच्यांबरोबर येथील कर्मचाऱ्यांकडूनही वन्य जिवांना धोका असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे. यात काही अधिकारीच सामील होतात, हे त्याहून गंभीर आहे. काहींवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे तरी असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. या अभयारण्यात डुक्कर, भेकर, ससा, सांबर, साळिंदर, मोर अशा शिकार होणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी राखीव असलेल्या दाजीपूर जंगलाचे १९५८ मध्ये अभयारण्यात रूपांतर करण्यात आले, तर १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. ३५१.१६ किलोमीटर क्षेत्रफळाच्या राधानगरी अभयारण्याची निर्मिती झाली. पूर्वी येथे शिकारी होत होत्या. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली आहेत; पण हे शिकाऱ्यांचे वारस मानायला तयार नाहीत.जंगलाच्या हद्दीत २५ गावे, वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी अनेकजण शिकारी आहेत. त्यांच्या सहकायार्तून बाहेरून येणारे काही धनिक, राजकारणी लोक आपली मौज करण्यासाठी येथे वारंवार येतात. पर्यटनाच्या नावाखाली शिकारी चालतात. येथील काही शिकारींचा वाटा सर्व संबंधिताना वेळोवेळी पोहोचविला जातो. क्वचित एखादा नवखा सापडला, तर त्याची ‘शिकार’ केली जाते. या अभयारण्यात बिबट्याची शिकार झाली आहे. मात्र, त्यांना कसलीही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हे लोक निर्ढावले आहेत.वारंवार घडणारे हे प्रकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत नाहीत असे नाही. काहीवेळा अधिकारीच दडपण आणतात, तर काही कर्मचारी तडजोडी करतात, असे अनेकवेळा समोर आले आहे. अर्थात सर्वच अधिकारी, कर्मचारी तसे नाहीत. त्यामध्ये इमाने इतबारे काम करणारेही आहेत; पण त्यांनाच काहीवेळा त्रास झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वन विभागाचे कायदे पोलिसांपेक्षाही कडक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा वापर कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी करतात, हे समोर आले आहे. मनात आणले तर या कायद्याचा वापर करून येथील तस्करी, शिकारी यांसारख्या प्रवृत्तींचा समूळ नायनाट शक्य आहे. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.