शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:28 IST

जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजय पारकर - राधानगरीअभयारण्यातील काही लोभी कर्मचाऱ्यांमुळे वन्यजीव विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे. बाहेरच्यांबरोबर येथील कर्मचाऱ्यांकडूनही वन्य जिवांना धोका असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे. यात काही अधिकारीच सामील होतात, हे त्याहून गंभीर आहे. काहींवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे तरी असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. या अभयारण्यात डुक्कर, भेकर, ससा, सांबर, साळिंदर, मोर अशा शिकार होणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी राखीव असलेल्या दाजीपूर जंगलाचे १९५८ मध्ये अभयारण्यात रूपांतर करण्यात आले, तर १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. ३५१.१६ किलोमीटर क्षेत्रफळाच्या राधानगरी अभयारण्याची निर्मिती झाली. पूर्वी येथे शिकारी होत होत्या. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली आहेत; पण हे शिकाऱ्यांचे वारस मानायला तयार नाहीत.जंगलाच्या हद्दीत २५ गावे, वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी अनेकजण शिकारी आहेत. त्यांच्या सहकायार्तून बाहेरून येणारे काही धनिक, राजकारणी लोक आपली मौज करण्यासाठी येथे वारंवार येतात. पर्यटनाच्या नावाखाली शिकारी चालतात. येथील काही शिकारींचा वाटा सर्व संबंधिताना वेळोवेळी पोहोचविला जातो. क्वचित एखादा नवखा सापडला, तर त्याची ‘शिकार’ केली जाते. या अभयारण्यात बिबट्याची शिकार झाली आहे. मात्र, त्यांना कसलीही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हे लोक निर्ढावले आहेत.वारंवार घडणारे हे प्रकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत नाहीत असे नाही. काहीवेळा अधिकारीच दडपण आणतात, तर काही कर्मचारी तडजोडी करतात, असे अनेकवेळा समोर आले आहे. अर्थात सर्वच अधिकारी, कर्मचारी तसे नाहीत. त्यामध्ये इमाने इतबारे काम करणारेही आहेत; पण त्यांनाच काहीवेळा त्रास झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वन विभागाचे कायदे पोलिसांपेक्षाही कडक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा वापर कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी करतात, हे समोर आले आहे. मनात आणले तर या कायद्याचा वापर करून येथील तस्करी, शिकारी यांसारख्या प्रवृत्तींचा समूळ नायनाट शक्य आहे. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.