शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:28 IST

जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजय पारकर - राधानगरीअभयारण्यातील काही लोभी कर्मचाऱ्यांमुळे वन्यजीव विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे. बाहेरच्यांबरोबर येथील कर्मचाऱ्यांकडूनही वन्य जिवांना धोका असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे. यात काही अधिकारीच सामील होतात, हे त्याहून गंभीर आहे. काहींवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे तरी असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. या अभयारण्यात डुक्कर, भेकर, ससा, सांबर, साळिंदर, मोर अशा शिकार होणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी राखीव असलेल्या दाजीपूर जंगलाचे १९५८ मध्ये अभयारण्यात रूपांतर करण्यात आले, तर १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. ३५१.१६ किलोमीटर क्षेत्रफळाच्या राधानगरी अभयारण्याची निर्मिती झाली. पूर्वी येथे शिकारी होत होत्या. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली आहेत; पण हे शिकाऱ्यांचे वारस मानायला तयार नाहीत.जंगलाच्या हद्दीत २५ गावे, वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी अनेकजण शिकारी आहेत. त्यांच्या सहकायार्तून बाहेरून येणारे काही धनिक, राजकारणी लोक आपली मौज करण्यासाठी येथे वारंवार येतात. पर्यटनाच्या नावाखाली शिकारी चालतात. येथील काही शिकारींचा वाटा सर्व संबंधिताना वेळोवेळी पोहोचविला जातो. क्वचित एखादा नवखा सापडला, तर त्याची ‘शिकार’ केली जाते. या अभयारण्यात बिबट्याची शिकार झाली आहे. मात्र, त्यांना कसलीही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हे लोक निर्ढावले आहेत.वारंवार घडणारे हे प्रकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत नाहीत असे नाही. काहीवेळा अधिकारीच दडपण आणतात, तर काही कर्मचारी तडजोडी करतात, असे अनेकवेळा समोर आले आहे. अर्थात सर्वच अधिकारी, कर्मचारी तसे नाहीत. त्यामध्ये इमाने इतबारे काम करणारेही आहेत; पण त्यांनाच काहीवेळा त्रास झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वन विभागाचे कायदे पोलिसांपेक्षाही कडक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा वापर कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी करतात, हे समोर आले आहे. मनात आणले तर या कायद्याचा वापर करून येथील तस्करी, शिकारी यांसारख्या प्रवृत्तींचा समूळ नायनाट शक्य आहे. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.