शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:28 IST

जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

संजय पारकर - राधानगरीअभयारण्यातील काही लोभी कर्मचाऱ्यांमुळे वन्यजीव विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे. बाहेरच्यांबरोबर येथील कर्मचाऱ्यांकडूनही वन्य जिवांना धोका असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे अधोरेखित होत आहे. यात काही अधिकारीच सामील होतात, हे त्याहून गंभीर आहे. काहींवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे तरी असल्या प्रकारांना आळा बसेल, अशी आशा आहे. या अभयारण्यात डुक्कर, भेकर, ससा, सांबर, साळिंदर, मोर अशा शिकार होणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. शाहू महाराजांच्या काळात शिकारीसाठी राखीव असलेल्या दाजीपूर जंगलाचे १९५८ मध्ये अभयारण्यात रूपांतर करण्यात आले, तर १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. ३५१.१६ किलोमीटर क्षेत्रफळाच्या राधानगरी अभयारण्याची निर्मिती झाली. पूर्वी येथे शिकारी होत होत्या. मात्र, कालांतराने त्यावर बंधने आली आहेत; पण हे शिकाऱ्यांचे वारस मानायला तयार नाहीत.जंगलाच्या हद्दीत २५ गावे, वाड्या, वस्त्या आहेत. त्यापैकी अनेकजण शिकारी आहेत. त्यांच्या सहकायार्तून बाहेरून येणारे काही धनिक, राजकारणी लोक आपली मौज करण्यासाठी येथे वारंवार येतात. पर्यटनाच्या नावाखाली शिकारी चालतात. येथील काही शिकारींचा वाटा सर्व संबंधिताना वेळोवेळी पोहोचविला जातो. क्वचित एखादा नवखा सापडला, तर त्याची ‘शिकार’ केली जाते. या अभयारण्यात बिबट्याची शिकार झाली आहे. मात्र, त्यांना कसलीही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे हे लोक निर्ढावले आहेत.वारंवार घडणारे हे प्रकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत नाहीत असे नाही. काहीवेळा अधिकारीच दडपण आणतात, तर काही कर्मचारी तडजोडी करतात, असे अनेकवेळा समोर आले आहे. अर्थात सर्वच अधिकारी, कर्मचारी तसे नाहीत. त्यामध्ये इमाने इतबारे काम करणारेही आहेत; पण त्यांनाच काहीवेळा त्रास झाल्याचे प्रकारही घडले आहेत. वन विभागाचे कायदे पोलिसांपेक्षाही कडक असल्याचे सांगितले जाते. त्यांचा वापर कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी करतात, हे समोर आले आहे. मनात आणले तर या कायद्याचा वापर करून येथील तस्करी, शिकारी यांसारख्या प्रवृत्तींचा समूळ नायनाट शक्य आहे. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.