शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील भोगावती खत प्रकल्प सुरू करा, अन्यथा जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

सडोली (खालसा) : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास व्हावा व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भोगावती रसायन खत कारखान्यास कवडीमोल ...

सडोली (खालसा) : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास व्हावा व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भोगावती रसायन खत कारखान्यास कवडीमोल दराने जमिनी दिल्या, परंतु गेल्या चाळीस वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. हा प्रकल्प सुरू करा, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा वाशी, ता. करवीर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चाळीस वर्षांपूर्वी माजी आमदार गोविंदराव कलिकते यांनी वाशी (ता. करवीर) गावच्या हद्दीत भोगावती सहकारी सूतगिरणीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी वाशी येथील जवळपास ४२ एकर जमिनीवर प्रकल्प निश्चित केला. १९८१-८२ पासून शेतकऱ्यांनी नाममात्र किंमत व घरातील एका व्यक्तीला नोकरी, अशा आश्वासनावर जमिनी दिल्या. पण गेल्या चाळीस वर्षांत या जमिनीवर प्रकल्प सुरू झाला नाही. परिणामी, सर्व शेतकरी व सभासदांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे गेल्या कित्येक वर्षात यापैकी एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. जमिनी देऊन आमचे खत झाले, परंतु अजूनही आमच्या मुलांना नोकरी दिली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रकल्प सुरू करा अन्यथा नाममात्र किमतीत घेतलेल्या आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदने देणार असून तिथे ठोस कार्यवाही न झाल्यास सर्व शेतकरी एकत्र येऊन प्रांताधिकारी, तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

फोटो: २५ वाशी शेतकरी

वाशी ता. करवीर येथील भोगावती रसायन खत प्रकल्प सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.