शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्टार ९२७ : ऑनलाईन शिक्षण अन्‌ मोबाईलने लावला मुलांना चष्मा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : दीड वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या काेरोनाने जगरहाटीच बदलून टाकली. त्यात सर्वाधिक बदल झाला तो शैक्षणिक वर्तुळात. ज्या ...

कोल्हापूर : दीड वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या काेरोनाने जगरहाटीच बदलून टाकली. त्यात सर्वाधिक बदल झाला तो शैक्षणिक वर्तुळात. ज्या मोबाईलला शाळा, महाविद्यालयात वापरण्यास बंदी होती, त्याच मोबाईलद्वारे शिक्षण देण्याची आणि घेण्याची वेळ कोरोनामुळे आली. शैक्षणिक सत्र वाया जाऊ नये म्हणून अपरिहार्यतेस्तव मोबाईलवर शिक्षण सुरू झाले, पण हेच मोबाईल विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर चष्मा चढवण्यास कारणीभूत ठरल्याने त्यांच्या नेत्ररोग तज्ज्ञांकडील फेऱ्या वाढल्या आहेत.

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मिनिटाला ३० वेळा पापण्यांची उघडझाप होणे, रात्री ६ ते ८ तास व्यवस्थित झोप हाेणे महत्त्वाचे असते, पण कोरोना काळात घरीच बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने लहान शाळक़री मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणांचे स्वास्थच या ऑनलाईन शिक्षणाने हिरावून घेतले. डोके जड होणे, डोळे लाल होणे, पाणी येणे, कोरडेपणा जाणवणे, मान व खांदे दुखणे अशा तक्रारी वाढल्या. यातून अनेकांच्या डोळ्यावर चष्माही लागला. अगदीच उमलत्या वयात डोळ्यांचे विकार वाढीस लागणे एक पिढीचे नुकसान करण्यासारखे आहे.

१) डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून...

अ) अँटी ग्लेयर चष्मा वापरावा

ब) संगणक स्क्रीनवर अँटी ग्लेयर ग्लास बसवावी

क) प्रत्येक ऑनलाईन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना थोडा आराम द्यावा

ड) झिरो नंबरचे चष्मे वापरावेत

इ) लाईट सुरु ठेवूनच मोबाईल, कॉम्प्युटर वापरावे

२) लहान मुलांना हे धोके

सतत मोबाईल आणि संगणक वापरल्याने विशेषत: लहान मुलांना जास्त धोके उद्भवतात. त्यांचे नेत्रपट नाजूक असते, त्यावर ताण पडल्यानंतर त्यांची दृष्टी अंधुक होऊ शकते. त्यांना नेत्रपटलाचे इन्फेक्नशनदेखील होऊ शकते. त्यामुळे दर २० मिनिटांनर त्यांना स्क्रीनपासून दूर ठेवून नजर इतरत्र वळवण्यास सांगावे. तरीदेखील डोळे कोरडे पडत असतील, पाणी येत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

३) डोळ्यांच्या आरोग्यासाठी ट्वेन्टी-ट्वेन्टी फॉर्म्युला

मोबाईल व कॉम्प्युटर स्क्रीन कमीत-कमी वापरणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले, तरी ती आजच्या युगाची अपरिहार्यता असल्याने योग्यप्रकारे काळजी घेऊन डोळे वाचवणे एवढेच आपल्या हातात. त्यासाठी डॉक्टर ट्वेन्टी-ट्वेन्टी फॉर्म्युला सांगतात. त्यानुसार दर २० मिनिटानंतर २० सेकंद नजर इतरत्र वळवायची. दूरचे पाहाचये, म्हणजे लांबची नजर सुधारते.

४) हे खा, डोळ्यांचे आरोग्य वाढवा

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अ आणि क जीवनसत्त्व आहारातून जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘अ’ जीवनसत्त्व पपई, आंबा, हिरव्या पालेभाज्यांतून मोठ्याप्रमाणावर जाते, तर क जीवनसत्त्वासाठी लिंबू, मोसंबी, संत्रा यासारखी फळे आहारात असणे आवश्यक आहे. कडधान्ये, डाळी, भाज्या जास्त प्रमाणात खाल्ले, तर डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

५) पालकही चिंतेत (पालक प्रतिक्रिया)

माझा मुलगा आता पाचवीत आहे. कोरोनाची साथ आल्यापासून त्याला मोबाईलवरच सगळा अभ्यास शिक्षकांकडून येतो. तास संपेपर्यंत उपस्थित राहावेच लागत असल्याने त्याला कितीही त्रास होत असला तरी ऑनलाईन लेक्चरला बसावेच लागते. अलीकडे त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल्याचे दिसल्याने रुग्णालयात दाखवले, त्यांनी चष्मा वापरण्या सांगितले.

वेदांत खाडे, बुधवारपेठ, कोल्हापूर

६) डाॅ. अभिजित ढवळे, सहयोगी प्राध्यकी नेत्ररोग विभाग, सीपीआर

जितका स्क्रीन टाईम जास्त तितका डोळे, मान, डोके यावरील ताण वाढत जातो. डोळ्यांचे विकार उद्भवू नयेत म्हणून स्क्रीन टाईम शक्य तेवढी कमी करणे हाच त्यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. पापण्यांची उघड-झाप, नजर इतरत्र वळवणे, अधून मधून थंड पाण्याचा डोळ्यांवर फवारा मारणे, हे करणे अत्यावश्यक आहे.