शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

(स्टार ८२२) कोरोना काळात हजारांवर आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न बहुतांशी जणांसमोर उभारला, जिव्हाळ्याची माणसे कोरोनाने मृत्यू पडली, नैराश्यमय वातावरणात अनेकांना जगणे असह्य झाले, कमकुवत मनाच्या लोकांत नैराश्येची भावना वाढली व आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले. अशांना वेळीच सावरण्यासाठी त्यांना भावनिक व आर्थिक आधाराची गरज असते. गेल्या दीड वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १००६ जणांनी आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद आहे.

कोरोनामुळे जीवनातील अर्थचक्रच बंद पडले, त्यामुळे २०२० मध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. माणसे कर्जाच्या खाईत लोटली अशातच व्यसनाधीनता वाढली. परिणामी नैराश्य येऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यातून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्या कालावधीत ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतानाच दुस-या लाटेनेही पुन्हा डोके वर काढले. दुस-या लाटेत, हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही तर सारेच अडचणीत असल्याची भावना वाढल्याचे दिसते. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ३०७ जणांनी जीवनयात्रा संपवली.

जिल्ह्यातील आत्महत्या-

- २०१९ मध्ये आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये आत्महत्या : ६१९

- २०२१ जाने. ते मे आत्महत्या : ३०७

आत्महत्या कोणत्या वयात... (जाने. ते मे २०२१)

- २५ वयापेक्षा कमी : ३५

- २६ ते ४० वयोगट : १३२

- ४१ ते ६० वयोगट : ११८

- ६० पेक्षा जास्त : २२

हे दिवस जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणीचा काळ येत असतो, नंतर आनंदाचे क्षणही येतात. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कोरोनाचे संकट हे फक्त एकट्यावरच नसून सर्वांवर आहे, त्याचा सर्वांनाच त्रास सुरू आहे. कोरोनामुळे सामाजिक बंधणे आली. एकलकोंडेपणा वाढला, नैराश्य आले असले तरीही अपराधीपणाची व नकारात्मक भावना सोडून प्रत्येकाने एकमेकांशी संभाषण सुरू ठेवावे. हेही दिवस लवकरच जातील, अशा अपेक्षा बाळगून परिस्थितीचा सामना करावा.

कुटूंबाने काळजी घेण्याची गरज...

संकटामुळे माणसावर आर्थिक, मानसिक दडपण असल्यास कुटूंबातील सदस्याने एकाप्याने राहिले पाहीजे. नैराश्य आले, त्याला एकटे नाही, कुटूंब व मित्रपरिवार सोबत आहे, याची जाणीव करून द्यावी. भावना व्यक्त झाल्या पाहिजे, माणसातील नैराश्य, भयगंड कमी करून विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे.

कोट...

कोरोनामुळे नैराश्य, काळजी, चिंता याचे आजार वाढले. अशांना मानसिक आधाराची गरज असते, प्रसंगी अशा व्यक्तींना समुपदेशन अथवा मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करून घेणे योग्य राहील. - डॉ. राकेश बेळगुद्री, मानसोपचारतज्ज्ञ, गडहिंग्लज.

कोट...

कोरोनामुळे मानसिक आजाराच्या प्रमाणात २० टक्के वाढ झाली. नैराश्य व भयगंड टाळण्यासाठी अपराधीपणाची भावना अगर नकारात्मकता काढली पाहिजे, वेळीच समुपदेशन केल्यास, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आत्महत्या रोखता येतील - डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर.