शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

स्वत:च्या हिमतीवर पैसे उभे करा

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

राजू शेट्टी : जिल्हा बँकेतील ठेव कपातीस विरोध; ‘एफआरपी’साठी उपोषणाचा इशारा

गडहिंग्लज : मुळातच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून ठेवी घेण्यास आपला ठाम विरोध आहे. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा दुप्पट व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांवर न टाकता स्वत:च्या हिमतीवर पैसे उभे करा आणि बँक चालवा, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नामोल्लेख टाळून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना दिला.खासदार शेट्टी मंगळवारी सायंकाळी गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन एफआरपी, जिल्हा बँकेचा कारभार व ‘दौलत’विषयीची संघटनेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.शेट्टी म्हणाले, राष्ट्रीयीकृत बँकेत दहा टक्के व्याजदराने विनाकपात पीककर्ज मिळते. मात्र, प्रचलित व्याजाबरोबरच संबंधित सेवा संस्था व जिल्हा बँकेच्या ठेव कपातीमुळे शेतकऱ्यांवर २१ टक्के व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. चार वर्षांपूर्वी यापेक्षाही अडचणीत असलेली बँक प्रशासकांनी सावरली. एका प्रशासकाला हे जमले, तर २२ संचालकांना हे का जमत नाही? बँकेवर नवीन संचालक मंडळ आल्यानंतर ३५० कोटींच्या ठेवी कमी झाल्या. यावरून ठेवीदारांचा संचालकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होेते. शेतकरी विरोधी संचालक मंडळ बरखास्त करून पुन्हा बँकेवर प्रशासकाची नेमणूक करावी.गेल्यावर्षी दोन शेतकऱ्यांचा बळी, हजारो आंदोलकांवर गुन्हे आणि साडेपाच कोटी भरपाईची नोटीस बजावून शासनाने साडेसहा हजार कोटीचे पॅकेज दिले. यावर्षी केवळ आमच्या दबावामुळे साडेअठराशे कोटींचे पॅकेज एफआरपीसाठी मिळाले आहे. तरीदेखील कारखानदार ही रक्कम देण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी. एफआरपी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावी. २२ जूनपासून ‘एफआरपी’प्रश्नी साखर आयुक्तांच्या दारात आपण बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. यासंबंधीचा निर्वाणीचा इशारा १९ जूनला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. आपणाला उपोषणाची संधी द्यायची की नाही? हे सरकारनेच ठरवावे, अशी टीप्पणीही शेट्टींनी केली. (प्रतिनिधी)‘दौलत’वर प्रशासक मंडळ नेमादौलत साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. त्यांची मुदतदेखील संपलेली आहे. त्यामुळे कारखान्यावर प्रशासक मंडळ नेमून ठेवी जमा कराव्यात. बँकांची देणी भागवून शासकीय देणीसाठी मुदत घ्यावी. थकीत देणी उशिरा मिळाली तरी स्वीकारण्याची शेतकरी व कामगारांची तयारी आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांची मालकी कायम ठेवून एक नवा प्रयोग म्हणून ‘दौलत’ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न शासनाने करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तसे झाल्यास ‘दौलत’ पुन्हा सुरू होऊ शकेल. तथापि, ‘दौलत’ विकण्याचा काही मंडळींचा डाव आहे, आम्ही तो विकू देणार नाही, असेही शेट्टींनी यावेळी स्पष्ट केले.