शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.महामंडळाचा 'खोळंबाच' जास्त

By admin | Updated: November 25, 2014 23:54 IST

सौंदत्ती यात्रा : ‘यात्रा विशेष बससेवा’ ही योजना लागू करण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एस. टी. महामंडळाचा खोळंबा आकार आणि किलोमीटरला आकारले जाणारे गाडीभाडे यांची चर्चा सुरू झाली आहे. एस. टी.च्या न परवडणाऱ्या दरामुळे खासगी वाहनांनी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एकमेव पर्याय असलेल्या परिवहन महामंडळाने पंढरपूरप्रमाणेच या यात्रेसाठीही ‘यात्रा विशेष बससेवा’ ही योजना लागू करावी, अशी संघटनांची मागणी आहे. सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा ५ डिसेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून चाळीस ते पन्नास हजार भाविक जातात. पूर्वी एस.टी.चे भाडे आणि खोळंबा आकार कमी असल्याने एस.टी.ने जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गाडीभाडे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर, तर खोळंबा आकार प्रतितास ९८ रुपये इतका करण्यात आला आहे. चार दिवस व तीन रात्री मुक्काम असा कालावधी असल्याने या काळात एस.टी. ५२ ते ५५ तास प्रवाशाविना भाविकांच्या ताब्यात असते. या कालावधीत जो काही दर आकारला जातो त्याला ‘खोळंबा आकार’ म्हणतात. सगळे मिळून एका एस.टी. ला २४ हजार रुपये भाडे द्यावे लागते; पण प्रवास भाड्यापेक्षा खोळंबा आकारच जास्त होतो त्यामुळे हा दर कमी करावा, अशी संघटनांची मागणी आहे. एस.टी.च्या वाढलेल्या दरामुळे एका कुटुंबातील अनेक व्यक्ती यात्रेला जाणार असतील तर त्यांना ते परवडत नाही; त्यामुळे आता खासगी गाड्यांनी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. भागाभागांतील नागरिक यात्रेदिवशीच गाड्या काढून जातात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या यात्रेसाठी एस.टी.च्या २५० ते ३०० गाड्या बुक व्हायच्या. आता ही संख्या १५०वर आली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बेलबाग येथील भाविकांसाठी एस.टी संभाजीनगर आगारातून, तर शाहूपुरी, राजारामपुरी येथील भाविकांसाठी मध्यवर्ती बसस्थानकातून गाड्या सोडल्या जातात. मात्र, पुढच्या वर्षीपासून यात्रा विशेष बससेवा योजना लागू व्हावी यासाठी आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आल्याची माहिती करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेचे उदय पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)गाड्या निघणार तीन तारखेला आता यात्रेला अवघे पाच-सात दिवस राहिल्याने दर कमी करण्यासाठी भांडत बसण्यास वेळ नाही. त्यामुळे महामंडळाच्या ठरलेल्या दराप्रमाणेच एस.टी.चे बुकिंग करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून दीडशेच्या आसपास एस.टी. बसेस रवाना होतात. यासाठी ३ डिसेंबरला मध्यरात्रीपासून गाड्या सौंदत्तीसाठी रवाना होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे सचिव अच्युतराव साळोखे यांनी दिली. या दरवाढीमुळे यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत दर आकारला जातो. यात प्रवास, चहा, नाष्टा आणि जेवणाचा समावेश आहे. एवढा दर आकारूनही संघटना किंवा गाडीप्रमुखांना ते परवडत नाही. मात्र, भाविकांच्या वतीने काहीवेळा महाप्रसादाची, चहाची वगैरे सोय केली जाते; त्यामुळे खर्च कसाबसा भागतो.