शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

एस.टी.महामंडळाचा 'खोळंबाच' जास्त

By admin | Updated: November 25, 2014 23:54 IST

सौंदत्ती यात्रा : ‘यात्रा विशेष बससेवा’ ही योजना लागू करण्याची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एस. टी. महामंडळाचा खोळंबा आकार आणि किलोमीटरला आकारले जाणारे गाडीभाडे यांची चर्चा सुरू झाली आहे. एस. टी.च्या न परवडणाऱ्या दरामुळे खासगी वाहनांनी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी एकमेव पर्याय असलेल्या परिवहन महामंडळाने पंढरपूरप्रमाणेच या यात्रेसाठीही ‘यात्रा विशेष बससेवा’ ही योजना लागू करावी, अशी संघटनांची मागणी आहे. सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा ५ डिसेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून चाळीस ते पन्नास हजार भाविक जातात. पूर्वी एस.टी.चे भाडे आणि खोळंबा आकार कमी असल्याने एस.टी.ने जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असायची. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गाडीभाडे ३८ रुपये प्रतिकिलोमीटर, तर खोळंबा आकार प्रतितास ९८ रुपये इतका करण्यात आला आहे. चार दिवस व तीन रात्री मुक्काम असा कालावधी असल्याने या काळात एस.टी. ५२ ते ५५ तास प्रवाशाविना भाविकांच्या ताब्यात असते. या कालावधीत जो काही दर आकारला जातो त्याला ‘खोळंबा आकार’ म्हणतात. सगळे मिळून एका एस.टी. ला २४ हजार रुपये भाडे द्यावे लागते; पण प्रवास भाड्यापेक्षा खोळंबा आकारच जास्त होतो त्यामुळे हा दर कमी करावा, अशी संघटनांची मागणी आहे. एस.टी.च्या वाढलेल्या दरामुळे एका कुटुंबातील अनेक व्यक्ती यात्रेला जाणार असतील तर त्यांना ते परवडत नाही; त्यामुळे आता खासगी गाड्यांनी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. भागाभागांतील नागरिक यात्रेदिवशीच गाड्या काढून जातात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या यात्रेसाठी एस.टी.च्या २५० ते ३०० गाड्या बुक व्हायच्या. आता ही संख्या १५०वर आली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बेलबाग येथील भाविकांसाठी एस.टी संभाजीनगर आगारातून, तर शाहूपुरी, राजारामपुरी येथील भाविकांसाठी मध्यवर्ती बसस्थानकातून गाड्या सोडल्या जातात. मात्र, पुढच्या वर्षीपासून यात्रा विशेष बससेवा योजना लागू व्हावी यासाठी आजी-माजी आमदार, लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आल्याची माहिती करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेचे उदय पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)गाड्या निघणार तीन तारखेला आता यात्रेला अवघे पाच-सात दिवस राहिल्याने दर कमी करण्यासाठी भांडत बसण्यास वेळ नाही. त्यामुळे महामंडळाच्या ठरलेल्या दराप्रमाणेच एस.टी.चे बुकिंग करण्यात आले आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून दीडशेच्या आसपास एस.टी. बसेस रवाना होतात. यासाठी ३ डिसेंबरला मध्यरात्रीपासून गाड्या सौंदत्तीसाठी रवाना होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे सचिव अच्युतराव साळोखे यांनी दिली. या दरवाढीमुळे यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत दर आकारला जातो. यात प्रवास, चहा, नाष्टा आणि जेवणाचा समावेश आहे. एवढा दर आकारूनही संघटना किंवा गाडीप्रमुखांना ते परवडत नाही. मात्र, भाविकांच्या वतीने काहीवेळा महाप्रसादाची, चहाची वगैरे सोय केली जाते; त्यामुळे खर्च कसाबसा भागतो.