शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

रत्नागिरीसह जिल्हा अंतर्गत एसटीची बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय ...

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत एसटीची बस सेवा बंद करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पंचगंगा, कानसा, कुंभी-कासारी आदी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे या नद्यांवरील बंधारे पूर्णत: पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गही येल्लूर गावाजवळ पाणी आल्यामुळे बंद आहे. तर निलजी बंधाराही वाहतुकीसाठी बंद केला आहे. मालेवाडी ते सोंडोली कानसा बंधाऱ्यावर वारणा नदीचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून ती विरळे जांभूर मार्गे वळविण्यात आली आहे. कळे (ता. करवीर) येथील किरवे येथेही रस्त्यावर पाणी आल्याने गगनबावडाकडील वाहतूकही बंद झाली आहे. कसबा बीड येथील महे पूलही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील एसटीची बससेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.