शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या गोरखधंद्यात गुरफटले यंत्रमाग व्यावसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या सर्वच उद्योगधंद्यांत व्यावसायिक समीकरणे बदलली आहेत. त्याचप्रमाणे मंदीच्या लाटेतून सावरणाऱ्या वस्त्रोद्योगातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या सर्वच उद्योगधंद्यांत व्यावसायिक समीकरणे बदलली आहेत. त्याचप्रमाणे मंदीच्या लाटेतून सावरणाऱ्या वस्त्रोद्योगातील यंत्रमागधारकांचे चक्रही अद्याप सुरळीतपणे फिरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच यंत्रमाग उद्योजकांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना व्याजाच्या गोरखधंद्यात गुरफटलेल्यांना सांभाळून घेत त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे.

गेल्या दहा वर्षांपासून वस्त्रोद्योग क्षेत्रात कमालीची मंदी निर्माण झाली आहे. त्यामध्ये गेल्या चार-पाच वर्षांत अधिकच मंदी आल्याने काही यंत्रमागधारक आपले कारखाने बंद करून अन्य व्यवसायाकडे वळले, तर पारंपरिक व्यवसाय म्हणून नुकसानीतही आपले व कामगारांचे कुटुंब चालवत जेमतेम पद्धतीने व्यवसाय चालू ठेवून तग धरून राहिलेले यंत्रमागधारक लॉकडाऊनमुळे पुरते बुडाले. या शहरात वस्त्रोद्योगाला १०० वर्षांची परंपरा आहे. अनेक कामगारच पुढे जाऊन मालक बनले. २४ तास व्यवसाय चालवून कष्टातून उद्योजक बनलेल्या अनेकांना बॅँकांमधून आवश्यक कर्ज पुरवठा मिळत नाही. त्यामुळे त्यांना अन्य खासगी संस्था अथवा खासगी सावकारांकडे व्यवसायासाठी कर्ज घ्यावे लागते.

याच कर्जाच्या व व्याजाच्या गोरखधंद्यात गुरफटलेल्या काही उद्योजकांनी आपले यंत्रमाग कारखाने विकून कर्जे भागवली. त्यातूनही ज्यांचे भागले नाही, त्यांनी मुदत घेऊन परतफेड करण्यासाठी धडपड सुरू ठेवली, परंतु लॉकडाऊनमुळे त्यात मोठी अडचण निर्माण झाली. त्यातूनच काहींनी आत्महत्येसारखा निर्णय घेतला. ज्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली, त्यामध्ये कर्ज व व्याजाचा तगादा तसेच व्यवसायातील अडचणींचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे.

याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन घोषणा केलेल्या सवलती ताबडतोब लागू कराव्यात. त्याचबरोबर खासगीमधील कर्जांमध्ये अडकलेल्या उद्योजकांना शासनासह विविध यंत्रमागधारक संघटनांनी सहानुभूती देत योग्य मार्ग दाखवावा.

चौकट

व्यापारी-उत्पादक सलोखा आवश्यक

सूत व्यापाऱ्यांनी कृत्रिम दरवाढ करून अडचणीत असलेल्या यंत्रमागधारकांना लुटण्याचे काम सुरू केले आहे, अशी भावना यंत्रमागधारकांतून व्यक्त होत आहे, तर सूत व्यापाऱ्यांकडून असा प्रकार होत नसल्याचे सांगितले जाते. यामध्ये दोन्ही घटकांनी एकत्र येत सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संयुक्त बैठकही बोलवण्यात आली. परंतु ती अद्याप झाली नाही.