शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषद भरवावी : सोळंकी

By admin | Updated: December 24, 2014 00:54 IST

रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा

कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर रेल्वेस्थानकातील समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच या रेल्वेस्थानकाच्या विकासाला चालना देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र रेल्वे विकास परिषदेचे तातडीने आयोजन करावे, तसेच या परिषदेला दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे अ‍ॅँड रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी यांनी निवेदनाद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांचा औद्योगिक विकास झाला आहे. पर्यटन, औद्योगिक, व्यापार, हॉटेल, आदी विकासाच्या दृष्टीने कोल्हापुरात भरपूर वाव आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. सन २०१५-१६ या वर्षात कोल्हापूरचे बहुतांश प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा सोळंकी यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहर कोकण रेल्वेला जोडल्यास रेल्वेचे पूर्व-पश्चिम जाळे विस्तारले जाऊ शकते. कोल्हापूरच्या पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात यावे, कोल्हापूर ते किर्लोस्करवाडी पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढवावी, डब्यांची संख्या वाढवावी, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट गाडी सुरू करावी, कोल्हापूर-हैदराबाद व तिरूपती या गाड्या सोलापूरमार्गे सोडल्यास हैदराबादचे अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार आहे. रात्री सुटणारी कोल्हापूर-सोलापूर गाडी पूर्ववत सकाळी सोडण्यात यावी, आठवड्यातून एकदा धावणाऱ्या दिल्ली, अहमदाबाद गाड्या आठवड्यातून तीन वेळा सोडण्यात याव्यात. जयपूर, अजमेर, जम्मू-काश्मीरसाठी नवीन गाड्या सुरू कराव्यात, कोयना एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, कोल्हापुरातील प्लॅटफॉर्मची संख्या वाढविण्यात यावी, आदी मागण्यांकडे सोळंकी यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.