शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

भाजीपाला विकायचा तरी कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न ...

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजीपाला हा नाशवंत असल्याने एक-दोन दिवसातच त्याची विक्री होणे आवश्यक असते, पण विक्रीसाठीची व्यवस्थाच नसल्याने पुन्हा एकदा भाजीपाला घेऊन दारोदारी भटकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना मंडई, अथवा रस्त्यावर बसून विक्रीस मज्जाव असल्याने तेही परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत.

भाजीपाला ही जीवनावश्यक गरज असलीतरी लोक शिस्त पाळत नसल्याने विक्रीस प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दोन दिवसांपासून खरेदीची मुभा दिली होती, पण कोणतेही नियम पाळले जात नसल्याने संसर्गाची वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्याकडेला देखील विक्रीस बसण्यास निर्बंध घातले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे शेतकरी बाजार समितीत सौद्याला माल पाठवत आहेत, पण तेथेही मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी दर निम्म्यावर आणले आहेत. शेतात कुजण्यापेक्षा औषध पाण्याचा तरी खर्च निघू दे म्हणून शेतकरी माल व्यापाऱ्यांना घालत आहेत.

पण याच वेळी छोट्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या दिवसात काकडी, कलींगड, गवारी, दोडका यांच्यासह भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर यांची मागणी बाजारात जास्त असते, ही मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन क्षेत्र वाढलेले असते. या सर्व भाज्या दरराेज तोडून त्या विक्रीस पाठवाव्या लागतात. छोटे शेतकरी गावातील आठवडी बाजारासह शहरातील मंडईमध्ये येऊन भाज्यांची विक्री करतात. पण आता त्यांना वाहतूकीसह रस्त्यावर बसण्यासही मज्जाव आल्याने हातातोंडाशी आलेले उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्न सतावू लागला आहे. बाजार समितीसह शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो दिवसभर बसून विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची अवस्थाही वाईट आहे. कोरोनाची भीती असली तरी त्यापेक्षाही पोटापाण्याची भीती जास्त आहे. ते भरण्यासाठी रोजची विक्री होणे आवश्यक आहे, पण कोरोनाच्या भीतीने झालेल्या लॉकडाऊनने सर्व चक्रच मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून मध्यममार्ग काढण्याची मागणी होत आहे.