शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

भाजीपाला विकायचा तरी कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न ...

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजीपाला हा नाशवंत असल्याने एक-दोन दिवसातच त्याची विक्री होणे आवश्यक असते, पण विक्रीसाठीची व्यवस्थाच नसल्याने पुन्हा एकदा भाजीपाला घेऊन दारोदारी भटकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना मंडई, अथवा रस्त्यावर बसून विक्रीस मज्जाव असल्याने तेही परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत.

भाजीपाला ही जीवनावश्यक गरज असलीतरी लोक शिस्त पाळत नसल्याने विक्रीस प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दोन दिवसांपासून खरेदीची मुभा दिली होती, पण कोणतेही नियम पाळले जात नसल्याने संसर्गाची वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्याकडेला देखील विक्रीस बसण्यास निर्बंध घातले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे शेतकरी बाजार समितीत सौद्याला माल पाठवत आहेत, पण तेथेही मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी दर निम्म्यावर आणले आहेत. शेतात कुजण्यापेक्षा औषध पाण्याचा तरी खर्च निघू दे म्हणून शेतकरी माल व्यापाऱ्यांना घालत आहेत.

पण याच वेळी छोट्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या दिवसात काकडी, कलींगड, गवारी, दोडका यांच्यासह भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर यांची मागणी बाजारात जास्त असते, ही मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन क्षेत्र वाढलेले असते. या सर्व भाज्या दरराेज तोडून त्या विक्रीस पाठवाव्या लागतात. छोटे शेतकरी गावातील आठवडी बाजारासह शहरातील मंडईमध्ये येऊन भाज्यांची विक्री करतात. पण आता त्यांना वाहतूकीसह रस्त्यावर बसण्यासही मज्जाव आल्याने हातातोंडाशी आलेले उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्न सतावू लागला आहे. बाजार समितीसह शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो दिवसभर बसून विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची अवस्थाही वाईट आहे. कोरोनाची भीती असली तरी त्यापेक्षाही पोटापाण्याची भीती जास्त आहे. ते भरण्यासाठी रोजची विक्री होणे आवश्यक आहे, पण कोरोनाच्या भीतीने झालेल्या लॉकडाऊनने सर्व चक्रच मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून मध्यममार्ग काढण्याची मागणी होत आहे.