शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

भाजीपाला विकायचा तरी कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न ...

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजीपाला हा नाशवंत असल्याने एक-दोन दिवसातच त्याची विक्री होणे आवश्यक असते, पण विक्रीसाठीची व्यवस्थाच नसल्याने पुन्हा एकदा भाजीपाला घेऊन दारोदारी भटकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना मंडई, अथवा रस्त्यावर बसून विक्रीस मज्जाव असल्याने तेही परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत.

भाजीपाला ही जीवनावश्यक गरज असलीतरी लोक शिस्त पाळत नसल्याने विक्रीस प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दोन दिवसांपासून खरेदीची मुभा दिली होती, पण कोणतेही नियम पाळले जात नसल्याने संसर्गाची वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्याकडेला देखील विक्रीस बसण्यास निर्बंध घातले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे शेतकरी बाजार समितीत सौद्याला माल पाठवत आहेत, पण तेथेही मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी दर निम्म्यावर आणले आहेत. शेतात कुजण्यापेक्षा औषध पाण्याचा तरी खर्च निघू दे म्हणून शेतकरी माल व्यापाऱ्यांना घालत आहेत.

पण याच वेळी छोट्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या दिवसात काकडी, कलींगड, गवारी, दोडका यांच्यासह भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर यांची मागणी बाजारात जास्त असते, ही मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन क्षेत्र वाढलेले असते. या सर्व भाज्या दरराेज तोडून त्या विक्रीस पाठवाव्या लागतात. छोटे शेतकरी गावातील आठवडी बाजारासह शहरातील मंडईमध्ये येऊन भाज्यांची विक्री करतात. पण आता त्यांना वाहतूकीसह रस्त्यावर बसण्यासही मज्जाव आल्याने हातातोंडाशी आलेले उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्न सतावू लागला आहे. बाजार समितीसह शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो दिवसभर बसून विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची अवस्थाही वाईट आहे. कोरोनाची भीती असली तरी त्यापेक्षाही पोटापाण्याची भीती जास्त आहे. ते भरण्यासाठी रोजची विक्री होणे आवश्यक आहे, पण कोरोनाच्या भीतीने झालेल्या लॉकडाऊनने सर्व चक्रच मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून मध्यममार्ग काढण्याची मागणी होत आहे.