शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला विकायचा तरी कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न ...

कोल्हापूर: लॉकडाऊन कडक झाल्याने किरकोळ विक्रीसाठीच्या बाजारपेठाच बंद झाल्या असून शेतात पिकवलेला भाजीपाला विकायचा तरी कुठे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजीपाला हा नाशवंत असल्याने एक-दोन दिवसातच त्याची विक्री होणे आवश्यक असते, पण विक्रीसाठीची व्यवस्थाच नसल्याने पुन्हा एकदा भाजीपाला घेऊन दारोदारी भटकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था असताना भाजीपाला विकून गुजराण करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना मंडई, अथवा रस्त्यावर बसून विक्रीस मज्जाव असल्याने तेही परिस्थितीसमोर हतबल झाले आहेत.

भाजीपाला ही जीवनावश्यक गरज असलीतरी लोक शिस्त पाळत नसल्याने विक्रीस प्रशासनाकडून मज्जाव घालण्यात आला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दोन दिवसांपासून खरेदीची मुभा दिली होती, पण कोणतेही नियम पाळले जात नसल्याने संसर्गाची वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने रस्त्याकडेला देखील विक्रीस बसण्यास निर्बंध घातले आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारे शेतकरी बाजार समितीत सौद्याला माल पाठवत आहेत, पण तेथेही मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी दर निम्म्यावर आणले आहेत. शेतात कुजण्यापेक्षा औषध पाण्याचा तरी खर्च निघू दे म्हणून शेतकरी माल व्यापाऱ्यांना घालत आहेत.

पण याच वेळी छोट्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या दिवसात काकडी, कलींगड, गवारी, दोडका यांच्यासह भेंडी, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर यांची मागणी बाजारात जास्त असते, ही मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन क्षेत्र वाढलेले असते. या सर्व भाज्या दरराेज तोडून त्या विक्रीस पाठवाव्या लागतात. छोटे शेतकरी गावातील आठवडी बाजारासह शहरातील मंडईमध्ये येऊन भाज्यांची विक्री करतात. पण आता त्यांना वाहतूकीसह रस्त्यावर बसण्यासही मज्जाव आल्याने हातातोंडाशी आलेले उत्पादन विकायचे कुठे असा प्रश्न सतावू लागला आहे. बाजार समितीसह शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो दिवसभर बसून विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची अवस्थाही वाईट आहे. कोरोनाची भीती असली तरी त्यापेक्षाही पोटापाण्याची भीती जास्त आहे. ते भरण्यासाठी रोजची विक्री होणे आवश्यक आहे, पण कोरोनाच्या भीतीने झालेल्या लॉकडाऊनने सर्व चक्रच मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातून मध्यममार्ग काढण्याची मागणी होत आहे.