शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

‘एफआरपी’पेक्षा साखरेची किमान दरवाढ हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याची शिफारस निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ केली तर सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे.

ऊसाची एकरकमी एफआरपी, साखरेचा बाजारातील दर याची सांगड घालताना कारखान्यांसमोर पेच निर्माण होतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोट्यवधीची कर्जे कारखान्यांनी एफआरपी देण्यासाठी घेतली आहेत. सध्या बाजारात साखरेचा दर ३१ रूपये आहे, त्या पटीतच बँकांकडून उचल मिळते. त्या पैशातून एफआरपी भागवताना कारखान्यांची दमछाक होत आहे. याबाबत साखर संघाने केंद्र सरकारकडे सातत्याने तक्रारी केल्या हाेत्या. त्यानुसार एफआरपीच्या कायद्यातच बदल करण्याची सूचना निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. आता ही जबाबदारी राज्य सरकारच्या समितीवर सोपवली आहे. चौदा दिवसात एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन-चार तुकडे करून देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एफआरपीचा कायदा मोडला तर कारखान्यांना जमेल तसे पैसे देण्यास मोकळीक राहणार आहे. ऊस पाठवल्यानंतर सात-आठ महिन्यांनी तुकडे करून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार आहेत व त्यालाच शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकरी व साखर कारखानदारांमध्ये संघर्ष उफाळणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तारणाऱ्या एफआरपी कायद्यात मोडतोड करण्यापेक्षा साखरेच्या किमान दरात वाढ करणे अधिक सोईचे होऊ शकते. त्या दृष्टीने केंद्राने विचार केल्यास शेतकरी आणि कारखानदारांमधील संघर्ष कमी होऊ शकतो.

कोट-

साखरेचा आणि ऊसाचा दर यात प्रतिटन ६०० रूपये कमी पडतात. एफआरपी दुरूस्ती करायची की, साखरेच्या किमान दरात वाढ करायची, यावर सरकारने निर्णय घेतला तरच कारखानदारी वाचणार आहे.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)