शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’पेक्षा साखरेची किमान दरवाढ हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याची शिफारस निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ केली तर सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे.

ऊसाची एकरकमी एफआरपी, साखरेचा बाजारातील दर याची सांगड घालताना कारखान्यांसमोर पेच निर्माण होतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोट्यवधीची कर्जे कारखान्यांनी एफआरपी देण्यासाठी घेतली आहेत. सध्या बाजारात साखरेचा दर ३१ रूपये आहे, त्या पटीतच बँकांकडून उचल मिळते. त्या पैशातून एफआरपी भागवताना कारखान्यांची दमछाक होत आहे. याबाबत साखर संघाने केंद्र सरकारकडे सातत्याने तक्रारी केल्या हाेत्या. त्यानुसार एफआरपीच्या कायद्यातच बदल करण्याची सूचना निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. आता ही जबाबदारी राज्य सरकारच्या समितीवर सोपवली आहे. चौदा दिवसात एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन-चार तुकडे करून देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एफआरपीचा कायदा मोडला तर कारखान्यांना जमेल तसे पैसे देण्यास मोकळीक राहणार आहे. ऊस पाठवल्यानंतर सात-आठ महिन्यांनी तुकडे करून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार आहेत व त्यालाच शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकरी व साखर कारखानदारांमध्ये संघर्ष उफाळणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तारणाऱ्या एफआरपी कायद्यात मोडतोड करण्यापेक्षा साखरेच्या किमान दरात वाढ करणे अधिक सोईचे होऊ शकते. त्या दृष्टीने केंद्राने विचार केल्यास शेतकरी आणि कारखानदारांमधील संघर्ष कमी होऊ शकतो.

कोट-

साखरेचा आणि ऊसाचा दर यात प्रतिटन ६०० रूपये कमी पडतात. एफआरपी दुरूस्ती करायची की, साखरेच्या किमान दरात वाढ करायची, यावर सरकारने निर्णय घेतला तरच कारखानदारी वाचणार आहे.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)