शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

‘एफआरपी’पेक्षा साखरेची किमान दरवाढ हाच उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखान्यांना एफआरपी देताना होणारी दमछाक, त्यातून कारखान्यांवर उभे राहात असलेले कर्जाचे डोंगर पाहता, एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याची शिफारस निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ केली तर सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे.

ऊसाची एकरकमी एफआरपी, साखरेचा बाजारातील दर याची सांगड घालताना कारखान्यांसमोर पेच निर्माण होतो. गेल्या तीन-चार वर्षांपासून कोट्यवधीची कर्जे कारखान्यांनी एफआरपी देण्यासाठी घेतली आहेत. सध्या बाजारात साखरेचा दर ३१ रूपये आहे, त्या पटीतच बँकांकडून उचल मिळते. त्या पैशातून एफआरपी भागवताना कारखान्यांची दमछाक होत आहे. याबाबत साखर संघाने केंद्र सरकारकडे सातत्याने तक्रारी केल्या हाेत्या. त्यानुसार एफआरपीच्या कायद्यातच बदल करण्याची सूचना निती आयोगाने केंद्राकडे केली आहे. आता ही जबाबदारी राज्य सरकारच्या समितीवर सोपवली आहे. चौदा दिवसात एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन-चार तुकडे करून देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एफआरपीचा कायदा मोडला तर कारखान्यांना जमेल तसे पैसे देण्यास मोकळीक राहणार आहे. ऊस पाठवल्यानंतर सात-आठ महिन्यांनी तुकडे करून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडणार आहेत व त्यालाच शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे शेतकरी व साखर कारखानदारांमध्ये संघर्ष उफाळणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तारणाऱ्या एफआरपी कायद्यात मोडतोड करण्यापेक्षा साखरेच्या किमान दरात वाढ करणे अधिक सोईचे होऊ शकते. त्या दृष्टीने केंद्राने विचार केल्यास शेतकरी आणि कारखानदारांमधील संघर्ष कमी होऊ शकतो.

कोट-

साखरेचा आणि ऊसाचा दर यात प्रतिटन ६०० रूपये कमी पडतात. एफआरपी दुरूस्ती करायची की, साखरेच्या किमान दरात वाढ करायची, यावर सरकारने निर्णय घेतला तरच कारखानदारी वाचणार आहे.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)