शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कोरोना महामारी रोखण्यासाठी समाजप्रबोधन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कोपार्डे : कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकचळवळ व समाजप्रबोधन महत्त्वाचे असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ...

कोपार्डे : कोरोना महामारी रोखण्यासाठी लोकचळवळ व समाजप्रबोधन महत्त्वाचे असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना आ. प्रा. जयंत आसगावकर यांनी केली.

वाकरे (ता. करवीर) येथे विलगीकरण कक्ष उद्घाटन, ग्रामपंचायतीस रुग्णवाहिका प्रदान व स. ब. खाडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने कोरोना जनजागृती उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते.

आमदार आसगावकर यांनी गाव तलावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, तलाव पर्यटन स्थळ आणि ऑक्सिजन पार्क निर्मिती करणे यासाठी शासनस्तरावर निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वाकरेचे सरपंच वसंत तोडकर व कुंभीचे संचालक संजय पाटील यांच्या आर्थिक मदतीने ग्रामपंचायतीस रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी

करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, उपसरपंच शारदा पाटील, कुंभी कासारीचे संचालक संजय पाटील, यशवंत बँक संचालक संग्राम भापकर, कुंडलिक पाटील, संजय डी. पाटील, जि. प. सदस्य सुभाष सातपुते, दीपक माने, प्राचार्य डॉ. डी. डी.कुरळपकर उपस्थित होते.

फोटो

: २५ वाकरे रुग्णवाहिका

वाकरे (ता. करवीर) येथे सरपंच वसंत तोडकर व कुंभीचे संचालक यांच्या आर्थिक मदतीने रुग्णवाहिका प्रदान करताना आ. प्रा. जयंत आसगावकर, सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच शारदा पाटील, कुंडलिक पाटील, संजय पाटील.