शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

...तर आम्ही सरकारची गंमत करू

By admin | Updated: October 13, 2015 00:09 IST

राजू शेट्टी यांचा इशारा : ऊस उत्पादकांना पहिली उचल घसघशीत मिळाली पाहिजे

आजरा : कायद्यानुसार एफआरपीची उचल एकरकमी न देता ती तीन तुकड्यांत देण्याचा डाव साखर कारखानदारांनी चालवला आहे. अशावेळी सरकारने एकीकडे एफआरपी कायद्यानुसार उचल द्यावी, असे म्हणत असतानाच एफआरपीच्या धोरणात बदल करण्याची भाषा सुरू करून शेतकऱ्यांची गंमत करून केवळ बघ्याची भूमिका घेत असेल व संशयास्पद वागत असेल, तर सरकारची आम्हीही गंमत करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.१६ आॅक्टोबरला साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे आयोजित स्वाभिमानीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची एकंदर अवस्था पाहता ऊस उत्पादकांना घसघशीत पहिली उचल मिळण्याची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्रात यंदा सुमारे २० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. असे असूनही कारखानदार मंडळी सरकारच्या मदतीकडे लक्ष देऊन आहेत. कारखानदारांना पैसे देणे म्हणजे दारूड्याला पैसे देण्यातला प्रकार आहे. मुळात कारखान्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.प्रा. जालंदर पाटील म्हणाले, उसाचे गणित राजू शेट्टी यांनी मांडले. कारखानदारांनी कारखाने लुटून स्वत:ची घरे भरण्यापलीकडे काहीही केले नाही. अनुकंपा तत्त्वावरचे नेते विधानसभेत पाठविण्यापेक्षा स्वाभिमानीचा एखादा चेहरा विधानसभेत पाठवा, असे आवाहनही केले.यावेळी राजू गड्यान्नावर, तानाजी देसाई, कृष्णा पाटील, आबासाहेब पाटील, नारायण सावंत, विनायकराव देसाई, सखाराम केसरकर, नंदकुमार सरदेसाई, निवृत्ती कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यमान आमदारांना आजरा, बिद्री व भोगावती साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नाही, असा टोला प्रा. जालंदर पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना लगावला.शेतकऱ्यांच्या पैशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहणार नाहीत. शेतकऱ्यांची कारखानदारांनी थट्टा करू नये, असे खासदार शेट्टी यांनी सुनावले. १६ तारखेचा मोर्चा प्रचंड संख्येने उपस्थित राहून विक्रमी करावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले.