शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्ही सरकारची गंमत करू

By admin | Updated: October 13, 2015 00:09 IST

राजू शेट्टी यांचा इशारा : ऊस उत्पादकांना पहिली उचल घसघशीत मिळाली पाहिजे

आजरा : कायद्यानुसार एफआरपीची उचल एकरकमी न देता ती तीन तुकड्यांत देण्याचा डाव साखर कारखानदारांनी चालवला आहे. अशावेळी सरकारने एकीकडे एफआरपी कायद्यानुसार उचल द्यावी, असे म्हणत असतानाच एफआरपीच्या धोरणात बदल करण्याची भाषा सुरू करून शेतकऱ्यांची गंमत करून केवळ बघ्याची भूमिका घेत असेल व संशयास्पद वागत असेल, तर सरकारची आम्हीही गंमत करू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.१६ आॅक्टोबरला साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे आयोजित स्वाभिमानीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची एकंदर अवस्था पाहता ऊस उत्पादकांना घसघशीत पहिली उचल मिळण्याची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे महाराष्ट्रात यंदा सुमारे २० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. असे असूनही कारखानदार मंडळी सरकारच्या मदतीकडे लक्ष देऊन आहेत. कारखानदारांना पैसे देणे म्हणजे दारूड्याला पैसे देण्यातला प्रकार आहे. मुळात कारखान्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.प्रा. जालंदर पाटील म्हणाले, उसाचे गणित राजू शेट्टी यांनी मांडले. कारखानदारांनी कारखाने लुटून स्वत:ची घरे भरण्यापलीकडे काहीही केले नाही. अनुकंपा तत्त्वावरचे नेते विधानसभेत पाठविण्यापेक्षा स्वाभिमानीचा एखादा चेहरा विधानसभेत पाठवा, असे आवाहनही केले.यावेळी राजू गड्यान्नावर, तानाजी देसाई, कृष्णा पाटील, आबासाहेब पाटील, नारायण सावंत, विनायकराव देसाई, सखाराम केसरकर, नंदकुमार सरदेसाई, निवृत्ती कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यमान आमदारांना आजरा, बिद्री व भोगावती साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नाही, असा टोला प्रा. जालंदर पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना लगावला.शेतकऱ्यांच्या पैशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहणार नाहीत. शेतकऱ्यांची कारखानदारांनी थट्टा करू नये, असे खासदार शेट्टी यांनी सुनावले. १६ तारखेचा मोर्चा प्रचंड संख्येने उपस्थित राहून विक्रमी करावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले.