शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी हवे ‘स्मार्ट’ मार्केटिंग

By admin | Updated: July 17, 2015 00:02 IST

कोल्हापूरही दावेदार : खासियत नीट मांडण्याची गरज; पर्यटन, कला, वैद्यकीय, औद्योगिक आदी बाबींमुळे ठरेल

सरसदेशाच्या प्रगतीमध्ये शहरांची भूमिकाआपल्या देशाची ६० टक्के वित्तीय चक्रे शहरकेंद्रित हलतात. देशविकासाला लागणारा ८० टक्के कर शहरांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मिळतो; त्यामुळे शहरांचा योग्य विकास हा सध्या कळीचा मुद्दा होऊ पाहत आहे. खेड्यांमधून शहरात येणाऱ्यांचा लोंढा वाढतच आहे. त्यामुळे २०२५ साली ७० टक्के लोकसंख्या शहरात राहू लागेल, असा अंदाज आहे. भारतातील शहरांची वाढ ही कागदावर शाई टाकल्यावर वेडीवाकडी जशी पसरते, त्याप्रमाणे अस्ताव्यस्त झाली आहे. ब्रिटिशांनी दिल्लीसारखी तर अलीकडील चंदीगडसारखी वसलेली शहरे सोडली, तर नागरी नियोजनाच्यादृष्टीने आपली शहरे प्लॅनिंग नसलेल्यांमध्येच मोडतात. आता तरी योग्य ती वाटचाल करून गाडी थोडी तरी रुळांवर आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने नवीन सरकारचे ‘स्मार्ट सिटीज’चे स्वप्न योग्य दिशेने पुढे गेल्यास शहरे सुधारतील, यात शंका नाही. - प्रमोद बेरी, आर्किटेक्ट स्पेनमध्ये राबविलेल्या नियमाप्रमाणे कुठलीही प्रचंड क्षेत्रातील अवाजवी जागा गेल्या २५ वर्षांत वापरली गेली नसेल, तर अशा अवाजवी जागेतील फक्त २० टक्के क्षेत्र नागरी तसेच कल्चरल अ‍ॅमेनिटीज व अल्प खर्चातील घरबांधणीसाठी घेणे गरजेचे झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कालांतराने अधिक विचार करता येईल. - प्रमोद बेरी, आर्किटेक्ट कोल्हापूरचा महाराष्ट्रातील ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समावेश होऊन निधी उपलब्ध व्हायचा असेल तर आपण नेहमीचे निकष तर योग्य तऱ्हेने मांडलेच पाहिजेत; पण आपल्याकडे असणारी खासियत, वेगळेपण ज्यामुळे इतरांपेक्षा आपला हक्क जास्त आहे, तेही मांडले पाहिजे.नव्या सरकारचे सर्वमान्य निकष स्मार्ट सिटीज होणार, असे जाहीर केल्यानंतर या विषयावर वृत्तपत्रे, तांत्रिक आणि मासिक परिषदांमधून प्रामुख्याने काही समान निकष पुढे आले आहेत. ते असे : जीवनमानाची गुणवत्ता सुधारणे (स्मार्ट सिटीजमध्ये राहणे सुकर तर व्हावेच; पण सर्वांगीण विकासात्मक हवे.)पाणी, हवा व आवाजाचे प्रदूषण कमी करणे, दळणवळण सुलभ होणे,सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणे, पादचारीसन्मुख रस्ते व फुटपाथ यांचा अपंग व वयस्कर लोकांना सुलभ वापर अपेक्षित आहे. (गावातील सर्व इमारतींचे प्रवेशद्वारही तसेच हवे.),काही रस्ते ‘पार्ट टाइम’ तरी पादचारीसन्मुख असावेत, तर काही रस्ते पूर्णत: सकाळी आठ ते रात्री १० पर्यंत जवळजवळ पूर्णत: तसे ठेवता येतील. नदी व नालेस्वच्छता, ज्या बिल्डिंगच्या गच्च्या हरित वापराच्या असतील त्यांना, तसेच पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, मैला परिवर्तन, सूर्यऊर्जा वापर, आदी हरिततत्त्वांचा वापर करणाऱ्यांना करांमध्ये भरीव सूट.झोपटपट्टी निर्मूलन तसेच सर्वांना शौचालयाची सोय व वापरावयाची सक्ती.सार्वजनिक वाहनतळाची योग्य सोय.वेगळे फेरीवाले विभाग तयार करणे.जुळ्या शहरांचा विचार.योग्य प्रतीच्या व तत्पर महापालिका सेवा उपलब्ध असणे.मनुष्यबळ निर्मिती व रोजगार उपलब्धता यासाठी औद्योगिक, बांधकाम, पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती.कमीत कमी गुन्हे असणारे शहर.कचरा व्यवस्थापन, सांडपाणी ट्रीटमेंट, ड्रेनेज मेंटेनन्स, आदी बाबींमध्ये यंत्रसामग्रीचा वापर.शहरातील आर्किटेक्टस, इंजिनिअर्स, कारखानदार, व्यापारी, आदी संस्थांचा प्लॅनिंग प्रक्रियेत सकारात्मक सहभाग करून घेणे.थोडक्यात, ‘स्मार्ट सिटी’मध्ये रहिवाशांचे जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुधारण्याबरोबर सर्वांगीण सुधारणे अपेक्षित आहे.01कोल्हापूरमध्ये टुरिझम (पर्यटन) व रिलिजियस टुरिझम (धार्मिक पर्यटन) याला अजून खूपच वाव आहे. अंबाबाई, जोतिबा देऊळ, कोल्हापूरच्या आसपास तासाच्या अंतरावर असणारी जंगले व थंड हवेची ठिकाणे या व इतर चर्चा, बाबींचे जबरदस्त मार्केटिंग होणे गरजेचे आहे. सध्या अंबाबाई दर्शनासाठी पावसाळा असूनही प्रतिदिन २५ हजार, उन्हाळ््यात प्रतिदिन ७५ हजार आणि दसऱ्यासारख्या सणामध्ये किमान सव्वा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.02कोल्हापूरचा चप्पल व चांदी व्यवसायही अधिक विकसित होऊ शकतो. कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांची वेगळी अशी खासियत आहे. त्याचेही मार्केटिंग होऊ शकते. ०403‘कलापूर’ असल्याने आर्ट व क्राफ्ट सिटी म्हणून बनविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.देशातील इतर मोठ्या शहरांत असणाऱ्या सुविधा. उदा. - प्राणिसंग्रहालय, आर्ट गॅलरी, आर्ट म्युझियम, क्रीडा केंद्र, आदी आपल्याकडे होणे अत्यंत गरजेचे आहे. ०6कोल्हापूर शहरामध्ये नॅशनल लेव्हलचे कन्व्हेशन सेंटर व एक्झिबिशन सेंटर झाल्यास शहर विकास होऊ शकतो. 10शहराचे देशांतील इतर भागांबरोबरचे दळणवळण सुविधापूर्वक सुधारण्यासाठी विमानसेवेची पुनर्सुरुवात, कोकण रेल्वे कनेक्टिव्हिटी, सर्व जिल्हास्तरीय रस्त्यांचे चौपदरीकरण (२ + २), आदी गरजेचे आहे. 12हे सर्व होण्यासाठी शहराची क्षेत्रवाढ तसेच बिनवापराच्या जागांचा अंशत: वापर होणे गरजेचे आहे. १९५१ साली शहराची सीमा ६७ चौरस किलोमीटर होती. तेव्हाची अंदाजे एक लाख लोकसंख्या आता आठ लाखांच्या आसपास जाऊन क्षेत्रामध्ये फारसा काहीही बदल झालेला नाही. 13शहरामध्ये एकहाती असणाऱ्या जागा, उदा. सरकारी क्षेत्रे, न्यू पॅलेस परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, आदींच्या अंशत: जागेच्या वापराचा प्राधान्याने विचार व्हावा.