शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

महापालिकेच्या आठ प्रभागांत किंचित बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील मतदार नोंदणी वाढल्यामुळे किमान चार ते पाच प्रभागांत किंचित ...

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील मतदार नोंदणी वाढल्यामुळे किमान चार ते पाच प्रभागांत किंचित बदल होणार आहेत; परंतु त्याचा परिणाम आठ ते दहा प्रभागांवर होईल. हा बदल करताना महापालिका अधिकाऱ्यांची बरीच धावपळ झाली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रात नव्याने मतदार नोंदणी झाली आहे. हीच मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीसाठी साधारण साडेसहा हजार ते सात हजार मतदारांचा एक प्रभाग करण्यात येतो; परंतु गेल्या पाच वर्षांत चार ते पाच प्रभागांत ही संख्या सात हजारांच्या पुढे गेली असल्याचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे जादा मतदार दुसऱ्या प्रभागात जोडण्याची प्रक्रिया पार पाडावी लागली. त्याचा परिणाम अन्य चार ते पाच प्रभागांवर झाला आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर सोडले तर महानगरपालिका प्रशासनाकडे सध्या निवडणुकीचा अनुभव असलेला एकही अधिकारी नाही. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेवेळी बुधवारी अधिकाऱ्यांचा गोंधळ उडालेला होता. दिवसभर काम करूनही अधिकाऱ्यांना आपण केलेले बदल योग्य आहेत, असे आत्मविश्वासपूर्वक सांगता आले नाही. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावेळीच प्रभाग रचनेतील फेरफार योग्य आहेत की नाही, हे अधिक स्पष्ट होणार आहे.