शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

शिराळा पश्चिममध्ये झाडांची कत्तल

By admin | Updated: May 16, 2015 00:02 IST

ठेकेदार मालामाल : ‘इको व्हिलेज’साठी कोट्यवधींचा खर्च; दुसरीकडे झाडांवर कुऱ्हाड

गंगाराम पाटील - वारणावती -शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, सोनवडे, मणदूर, करुंगली, पणुंब्रे, चरण, किनरेवाडी, चिंचेवाडीसह अन्य गावातील डोंगर, पठार व शिवारातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. वन खाते ठराविक झाडे तोडण्यासाठी परवानगी देते, पण तोडीची परवानगी घेणारे मात्र परवान्याच्या जोरावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करीत आहेत.शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे आणि दुसरीकडे झाडांची कत्तल सुरू आहे. शेवरीच्या झाडांचा उपयोग सेंट्रिंग व पॅकिंगच्या बॉक्ससाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ती झाडे तोडली जात असल्याने या भागातून शेवरीची झाडे नामशेष होत आहेत. हे थांबवण्याची मागणी लोकांतून व निसर्गप्रेमींमधून होत आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, सोनवडे, मणदूर, चरण आदींसह अन्य गावातील डोंगर, पठार व शिवारातील झाडांची कत्तल सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात ठेकेदार झाडे खरेदी करतात. त्याची सात-बाराला नोंद असेल व ते झाड धोकादायक असेल तर फॉरेस्ट खाते अशा झाडांच्या तोडीस परवानगी देते. पण ठेकेदार व फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून कोणत्याही झाडांना परवानगी घेतात. ठराविक झाडांना परवानगी घ्यायची आणि परवानगीच्या नावाखाली राजरोसपणे इतर झाडांची कत्तल करायची, असे प्रकार या परिसरात सुरू आहेत. यातून झाडे तोडणारे ठेकेदार व सॉ-मिलवाले लाखो रुपये कमवून मालामाल होत आहेत. या भागातील गरीब शेतकरी गरजेपोटी बांधावरील झाड विकून आपली गरज भागवतात; पण त्यांनाच जर घर बांधणीसाठी लाकूड लागले, तर मात्र झाडे तोडणारे ठेकेदार अशा शेतकऱ्यांना चढ्या दराने लाकूड देतात. चांदोली धरणाच्या पाटबंधारे खात्याच्या वसाहतीच्या व कार्यालयाच्या परिसरातील निलगिरी, शिसव व अन्य झाडे तोडण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी परवानगी देत आहेत. शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, तर मलिदा मिळविण्यासाठी शासनाचे अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देत आहेत. झाडे तोडल्यामुळे निसर्गाचा हिरवागर्द खजिना नामशेष केल्याने वारणावती वसाहत पार उजाड झालेली आहे.वृक्षतोड होत असल्याने त्याचा हवामानावर परिणाम होत आहे. शिवाय एकीकडे शासन वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च करुन इको व्हिलेज योजना राबवत आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीस परवानगी देणाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घालावेत व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.अधिकारीच देतात परवानगीराज्य शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, तर दुसरीकडे मलिदा मिळविण्यासाठी चांदोली धरणाच्या पाटबंधारे खात्याचे अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देऊन निसर्गाचा ऱ्हास करू लागले आहेत. त्याबाबत ग्रामस्थ, पर्यटकांतून संताप व्यक्त होत आहे.