शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सहा हजार फेरीवाले शासनाच्या मदतीस मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील फेरीवाल्यांचे गेल्या अनेक वर्षात नीट सर्वेक्षण तसेच अधिकृत नोंदणी न झाल्याचा फटका आता ऐन लॉकडाऊन ...

कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील फेरीवाल्यांचे गेल्या अनेक वर्षात नीट सर्वेक्षण तसेच अधिकृत नोंदणी न झाल्याचा फटका आता ऐन लॉकडाऊन काळात सहा हजार फेरीवाल्यांना बसणार आहे. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या १५०० रुपये अनुदानास या फेरीवाल्यांना मुकावे लागणार आहे. परंतु महापालिकेकडे नोंदणी केलेल्या ५६०७ नोंदणीकृत फेरीवाल्यांना हे अनुदान मिळू शकते.

बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तळगाळातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून रस्त्यावरील फेरीवाल्यांना पंधरा दिवसांसाठी १५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. त्याची प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात १५०० रुपयांचे अनुदान अतिशय कमी असून किमान पाच हजार रुपये तरी दिले पाहिजेत अशी मागणी होऊ लागली आहे.

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्याचे गेल्या काही वर्षापासून सर्वेक्षण सुरू आहे. परंतु त्याला फेरीवाल्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यालाही कमी प्रतिसाद मिळाला. परिणामी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अधांतरीच राहिली.

सन २०१३ मध्ये शहरस्तरीय फेरीवाला समितीतर्फे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षणात नोंद झालेल्या ७४०० फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी ३८०० फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक कार्ड घेतली. उर्वरित फेरीवाल्यांना कागदपत्रे सादर करण्याची वारंवार मुदत दिली. पण, प्रतिसाद मिळाला नाही. २०१६ मध्ये राज्य सरकारने फेरीवाला कायदा केला. त्यानुसार सर्वेक्षण झाले. सर्वेक्षणानंतर ५६०७ फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली. ही यादी राज्य सरकारच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आली. तरीही अनेक फेरीवाल्यांनी नोंदणीच केली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा विषय पुढे आला आहे. त्यामुळे शहरात फेरीवाले किती. त्यातील नोंदणीकृत किती, अनधिकृत किती हे निश्चित झालेले नाही.

-पॉईंटर -

- शहरातील फेरीवाल्यांची संख्या - अंदाजे ११ हजार

- नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांची संख्या - ५६०७

- गतवर्षी लॉकडाऊनमध्ये कर्ज घेतलेले फेरीवाले - ४४७८

-अनुदानास मुकणारे फेरीवाल्यांची संख्या - अंदाजे ६०००

- प्रतिक्रिया १ -

फेरीवाल्यांचा धंदा बंद ठेवायला नको होता. पंधराशे रुपयात काय होणार? पंधरा दिवस कसे काढायचे? ज्यांची नोंदणी झाली त्यांनाच अनुदान मिळणार आहे, बाकीच्या फेरीवाल्यांनी काय करायचे? महापालिकेचे सर्वेक्षण चुकीचे झाले. त्याला जबाबदार कोण?

मोहन क्षत्रीय,

हातगाडी चालक

प्रतिक्रिया २ -

पंधराशे रुपये फारच कमी आहेत. किमान पाच हजार रुपये द्यायला पाहिजे होते. महागाईच्या काळात पंधरा दिवस पंधराशे रुपयात काढायचे म्हणजे अवघड आहे.

सर्जेराव कोरे,

चायनिज हातगाडीचालक

प्रतिक्रिया ३ -

पंधराशे रुपयात आमचं पोटपाणी कसं चालणार हाच प्रश्न आहे. अनुदान देण्यापेक्षा आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली असती तर आमचा उदरनिर्वाह चालला असता. नियम पाळून व्यवसाय करायलाच परवानगी द्यावी.

सदानंद घाटगे,

चहागाडीवाले