शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महामार्गावर होणार सहा उड्डाणपूल

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

कागल ते सातारा : हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब

सतीश पाटील - शिरोली -पुणे-बंगलोर महामार्गावर कागल ते सातारा या १३३ कि.मी.च्या अंतरात सहा नवीन उड्डाणपूल होणार आहेत. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले.पुणे-बंगलोर दुपदरीवर अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूक वाढली म्हणून चतुष्कोन योजनेंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. कागल ते सातारा या १३३ कि.मी. रस्त्याचे काम सन २००६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या कामासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च होता. सुमारे पाच ठेकेदार या रस्त्याचे काम करत होते.अनेकदा मुख्य मार्गात बदल करण्यात आला. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ आणि या पाच ठेकेदारांनी घाईगडबडीने काम पूर्ण केले. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्ग शेजारील अनेक गावांनी उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांची मागणी केली; पण आयत्यावेळी आलेल्या मागण्या रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने घेतल्या नाहीत व महामार्ग २००६ ला वाहतुकीस खुला केला.अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चौपदरीकरण केले; पण अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. सन २००८ ते सन २०१४ या सात वर्षात या कागल ते सातारा या १३३ कि.मी. मध्ये सुमारे ७४९ अपघात झाले आहेत. यात १०४३ जखमी, तर २२६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बरेचसे अपघात गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा येथे झाले आहेत. ही या मार्गावरील प्रमुख अपघात क्षेत्रेच आहेत. याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने केली होती; पण त्यावेळी रस्ते विकास महामंडळाने व शासनाने ही गांभीर्याने याकडे लक्ष दिले नाही. याच सहा ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर शासनाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करताना याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. या सहा ठिकाणी उड्डाणपूल झाले की निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.उड्डाणपुलांची ठिकाणेगोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा.