शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

महामार्गावर होणार सहा उड्डाणपूल

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

कागल ते सातारा : हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब

सतीश पाटील - शिरोली -पुणे-बंगलोर महामार्गावर कागल ते सातारा या १३३ कि.मी.च्या अंतरात सहा नवीन उड्डाणपूल होणार आहेत. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले.पुणे-बंगलोर दुपदरीवर अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूक वाढली म्हणून चतुष्कोन योजनेंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. कागल ते सातारा या १३३ कि.मी. रस्त्याचे काम सन २००६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या कामासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च होता. सुमारे पाच ठेकेदार या रस्त्याचे काम करत होते.अनेकदा मुख्य मार्गात बदल करण्यात आला. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ आणि या पाच ठेकेदारांनी घाईगडबडीने काम पूर्ण केले. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्ग शेजारील अनेक गावांनी उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांची मागणी केली; पण आयत्यावेळी आलेल्या मागण्या रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने घेतल्या नाहीत व महामार्ग २००६ ला वाहतुकीस खुला केला.अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चौपदरीकरण केले; पण अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. सन २००८ ते सन २०१४ या सात वर्षात या कागल ते सातारा या १३३ कि.मी. मध्ये सुमारे ७४९ अपघात झाले आहेत. यात १०४३ जखमी, तर २२६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बरेचसे अपघात गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा येथे झाले आहेत. ही या मार्गावरील प्रमुख अपघात क्षेत्रेच आहेत. याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने केली होती; पण त्यावेळी रस्ते विकास महामंडळाने व शासनाने ही गांभीर्याने याकडे लक्ष दिले नाही. याच सहा ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर शासनाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करताना याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. या सहा ठिकाणी उड्डाणपूल झाले की निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.उड्डाणपुलांची ठिकाणेगोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा.