शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर होणार सहा उड्डाणपूल

By admin | Updated: December 25, 2014 00:14 IST

कागल ते सातारा : हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब

सतीश पाटील - शिरोली -पुणे-बंगलोर महामार्गावर कागल ते सातारा या १३३ कि.मी.च्या अंतरात सहा नवीन उड्डाणपूल होणार आहेत. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले.पुणे-बंगलोर दुपदरीवर अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूक वाढली म्हणून चतुष्कोन योजनेंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. कागल ते सातारा या १३३ कि.मी. रस्त्याचे काम सन २००६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या कामासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च होता. सुमारे पाच ठेकेदार या रस्त्याचे काम करत होते.अनेकदा मुख्य मार्गात बदल करण्यात आला. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ आणि या पाच ठेकेदारांनी घाईगडबडीने काम पूर्ण केले. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्ग शेजारील अनेक गावांनी उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांची मागणी केली; पण आयत्यावेळी आलेल्या मागण्या रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने घेतल्या नाहीत व महामार्ग २००६ ला वाहतुकीस खुला केला.अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चौपदरीकरण केले; पण अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. सन २००८ ते सन २०१४ या सात वर्षात या कागल ते सातारा या १३३ कि.मी. मध्ये सुमारे ७४९ अपघात झाले आहेत. यात १०४३ जखमी, तर २२६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बरेचसे अपघात गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा येथे झाले आहेत. ही या मार्गावरील प्रमुख अपघात क्षेत्रेच आहेत. याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने केली होती; पण त्यावेळी रस्ते विकास महामंडळाने व शासनाने ही गांभीर्याने याकडे लक्ष दिले नाही. याच सहा ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर शासनाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करताना याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. या सहा ठिकाणी उड्डाणपूल झाले की निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.उड्डाणपुलांची ठिकाणेगोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा.