शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शिरोळला नगरपरिषद मंजुरीचे त्रांगडे सुटता सुटेना

By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST

मतदारसंघ अंतिम फेररचना आज : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

संदीप बावचे-- शिरोळ -खासदार, आमदारांच्या पाठपुराव्यामुळे शिरोळ नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, ग्रामपंचायतीने नगरपरिषदेसाठी दिलेला ठराव त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्ररचना, नगरपरिषदेप्रश्नी ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका यामुळे शिरोळ नगरपरिषद मंजूर केव्हा होणार? हाच प्रश्न सध्या चर्चेचा बनला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघ फेररचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिरोळ नगरपरिषदेचा विषय ऐरणीवर आला. आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने नगरपरिषदेप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेप्रश्नी आतापर्यंत तीनवेळा सुनावणी झाली. मात्र, निर्णय अद्याप झालेला नाही. खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळला नगरपरिषद मंजूर करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला नगरपरिषदेप्रश्नी ग्रामसभा व मासिक सभा घेऊन ठराव देण्याबाबत आदेश दिले होते. १४ सप्टेंबरला मासिक सभेचा, तर १६ सप्टेंबरला ग्रामसभेचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. जि.प. व पं.स. मतदारसंघ अंतिम फेररचना आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी नगरपरिषदेचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, तो निर्णय एक महिना लांबणीवर गेल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरच नगरपरिषद मंजुरीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना काही काळच पदाचा कार्यकाल मिळणार आहे. सध्या जर-तरच्या गोष्टीवरच नगरपरिषदेची चर्चा शहरात घुमली आहे.मुंबईत आज सुनावणीशिरोळ नगरपरिषदेप्रश्नी आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेची आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिरोळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी खास बाब म्हणून नगरपरिषद मंजुरीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्याकडेही लक्ष लागून राहिले आहे. उलटसुलट चर्चाशिरोळ तालुक्यात आठऐवजी सात जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहेत. मतदारसंघ पुनर्ररचना कार्यक्रम शिवाय शिरोळला नगरपरिषद मंजुरीचा विषय यामुळे शिरोळचा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द होणार की नाही याबाबत शहरात उलटसुलट चर्चा आहे. एकूणच नगरपरिषदेचा निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.