शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

सतीश पाटील शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी ...

सतीश पाटील

शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी मागणी हालोंडीच्या नागरिकांनी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.

कोल्हापूर-सांगली मार्गावर असलेले हातकणंगले तालुक्यातील हालोंडी गाव. या गावची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या घरात. ५०० हून अधिक पशुधन, ६०० एकर शेती. या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की पुराचा वेढा बसतो. प्रत्येक वर्षी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी आलेल्या महापुराच्या पाण्यात गावातील तीन हजार लोक आसपासच्या गावांत जागा भेटेल तिकडे स्थलांतरित झाले. हालोंडीकरांचे पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्षभर कष्ट करून कमावलेला पैसा, धान्य, प्रापंचिक साहित्य क्षणार्धात डोळ्यासमोर पुरामधून वाहून गेले. याचा पार त्रास होतोय.. आम्हाला आमचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्या, या शब्दांत हालोंडीकरांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. यावर पवार यांनी येथील घरे, इमारती शासनाच्या ताब्यात देत असल्याचा ठराव करून पाठविल्यास शासन पुनर्वसन करेल, असे आश्वासन दिले. यावेळी हालोंडी गावचे सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच महावीर पाटील, जे. बी. पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान बेळंके, सुनीता पाटील, सुनीता शेटे, अजय पाटील, किरण कांबळे, रूपाली कांबळे, अलका माने, दिलीप पाटील, जयप्रकाश पाटील उपस्थित होते.

कोट :

आमच्या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीचा वेढा बसून पुराचे पाणी येते. गाव प्रत्येक वर्षी स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढून शासनाने आमचे पुनर्वसन करावे. - जयश्री कोळी, सरपंच

कोट :

प्रत्येक वर्षी पूर आला की जनावरे, प्रापंचिक साहित्य घेऊन बाहेर पडावे लागते. पूर ओसरला की पुन्हा गावात यायचं. हे चक्र कित्येक‌ वर्षे सुरू आहे. शासनाने आसपासच्या गावांत जागा देऊन आमचं पुनर्वसन करावे.

- महावीर पाटील, उपसरपंच

कोट :

गावात ५०० पशुधन आहे. ७०० एकर शेती आहे. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की आमची शेती पुराच्या पाण्यात जाते. महापुरामुळे जनावरे घेऊन बाहेर जावे लागते. हालोंडीचे पुनर्वसन होणे गरजेच आहे.

- वर्धमान बेळंके, ग्रामपंचायत सदस्य.

फोटो : २८ हालोंडी ग्राऊंड रिपोर्ट

पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हालोंडीकरांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.