शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

सतीश पाटील शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी ...

सतीश पाटील

शिरोली : प्रत्येक वर्षी महापुरामुळे आमचे नुकसान होत आहे. त्यामुळे साहेब, आमचं तेवढं पुनर्वसन करा, अशी मागणी हालोंडीच्या नागरिकांनी पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.

कोल्हापूर-सांगली मार्गावर असलेले हातकणंगले तालुक्यातील हालोंडी गाव. या गावची लोकसंख्या जेमतेम तीन हजारांच्या घरात. ५०० हून अधिक पशुधन, ६०० एकर शेती. या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की पुराचा वेढा बसतो. प्रत्येक वर्षी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी आलेल्या महापुराच्या पाण्यात गावातील तीन हजार लोक आसपासच्या गावांत जागा भेटेल तिकडे स्थलांतरित झाले. हालोंडीकरांचे पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्षभर कष्ट करून कमावलेला पैसा, धान्य, प्रापंचिक साहित्य क्षणार्धात डोळ्यासमोर पुरामधून वाहून गेले. याचा पार त्रास होतोय.. आम्हाला आमचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्या, या शब्दांत हालोंडीकरांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. यावर पवार यांनी येथील घरे, इमारती शासनाच्या ताब्यात देत असल्याचा ठराव करून पाठविल्यास शासन पुनर्वसन करेल, असे आश्वासन दिले. यावेळी हालोंडी गावचे सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच महावीर पाटील, जे. बी. पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान बेळंके, सुनीता पाटील, सुनीता शेटे, अजय पाटील, किरण कांबळे, रूपाली कांबळे, अलका माने, दिलीप पाटील, जयप्रकाश पाटील उपस्थित होते.

कोट :

आमच्या गावाला प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीचा वेढा बसून पुराचे पाणी येते. गाव प्रत्येक वर्षी स्थलांतरित करावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढून शासनाने आमचे पुनर्वसन करावे. - जयश्री कोळी, सरपंच

कोट :

प्रत्येक वर्षी पूर आला की जनावरे, प्रापंचिक साहित्य घेऊन बाहेर पडावे लागते. पूर ओसरला की पुन्हा गावात यायचं. हे चक्र कित्येक‌ वर्षे सुरू आहे. शासनाने आसपासच्या गावांत जागा देऊन आमचं पुनर्वसन करावे.

- महावीर पाटील, उपसरपंच

कोट :

गावात ५०० पशुधन आहे. ७०० एकर शेती आहे. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला पूर आला की आमची शेती पुराच्या पाण्यात जाते. महापुरामुळे जनावरे घेऊन बाहेर जावे लागते. हालोंडीचे पुनर्वसन होणे गरजेच आहे.

- वर्धमान बेळंके, ग्रामपंचायत सदस्य.

फोटो : २८ हालोंडी ग्राऊंड रिपोर्ट

पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हालोंडीकरांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते.