शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर, आमच्या अ‍ॅडमिशनचं तेवढं बघा...!

By admin | Updated: July 4, 2016 00:30 IST

प्रवेशासाठी वशिलेबाजी : दादा, भाऊंच्या मागणीने प्राचार्य हैराण; विद्यार्थी, पालकांची धावपळ

संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर प्राधान्यक्रमातील चूक, मित्रांसमवेत शिकण्याचा हट्ट, घरापासून लांब पडणारे अंतर अशा विविध कारणांमुळे अकरावीसाठी महाविद्यालय बदलून मिळावे यासाठी विद्यार्थी, पालकांची सध्या धावपळ सुरू आहे. यासाठी ते अशा महाविद्यालय परिसरातील काही दादा, भाऊंसह शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष, संचालकांच्या माध्यमातून वशिला लावीत आहेत. या दादा, भाऊ, आदींकडून ‘सर, आमच्या अ‍ॅडमिशनचं तेवढं बघा’, ‘अ‍ॅडमिशनचे काम कराच’ अशा स्वरूपांतील मागणीमुळे प्राचार्य हैराण झाले आहे. शहरातील अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी शुक्रवारी (दि. १) प्रसिद्ध झाली. यावर्षी वैयक्तिक निकालाची टक्केवारी वाढल्याने प्रवेशाचा कटआॅफ तीन ते नऊ टक्क्यांनी वाढला. यात गुणांच्या टक्केवारीची ऐंशी-नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांना थेटपणे त्यांनी पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळाला आहे. मात्र, ज्यांना ५५ ते ६५ टक्के गुण असून, त्यांना पसंतीनुसार महाविद्यालय मिळालेले नाही, ज्यांनी प्रवेश अर्ज भरताना चुकीचा प्राधान्यक्रम दिला आहे, ज्यांना मित्रांसमवेतच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांचे महाविद्यालय बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून महाविद्यालय परिसरातील काही दादा, भाऊंच्या माध्यमातून प्राचार्यांना वशिला लावला जात आहे. काहींनी थेट संबंधित महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, संचालकांकडून प्रयत्न सुरू केले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा शब्द हे दादा, भाऊ देत असून, प्रवेशासाठी ते प्राचार्यांकडे आग्रह धरत आहेत. पण, निवड यादीनुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रवेश क्षमता पूर्ण भरत असल्याने त्यांची मागणी कशी पूर्ण करावयाची, हा प्रश्न प्राचार्यांसमोर उभारला आहे. कट-आॅफ वाढलेल्या महाविद्यालयांत गर्दी कोल्हापूर : अकरावीचा कट-आॅफ वाढलेल्या विवेकानंद महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, आदी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. यातील न्यू कॉलेजमध्ये रविवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. दिवसभरात येथे ११५ जणांनी प्रवेश निश्चित केले. यंदा विज्ञान शाखेतील विवेकानंद महाविद्यालय व न्यू कॉलेजचा कट-आॅफ ९१.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यापाठोपाठ राजाराम महाविद्यालय (९१.४० टक्के), एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज (८९.८०), महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (८८.४०), कमला कॉलेज (८७.४०), गोखले कॉलेज (८४.२०) यांचा क्रम आहे. वाणिज्य शाखेमध्ये न्यू कॉलेज (८१.८०), कमला कॉलेज (७७.६०) आणि कॉमर्स कॉलेज (७६.८०) आघाडीवर आहे. न्यू कॉलेज (७१.४०), स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेज (६२.६०), महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (६१.६०) असा कट-आॅफ असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दरम्यान, न्यू कॉलेजमधील अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. या ठिकाणी दिवसभरात ११५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. ‘आयटीआय’साठी १२५ अर्जांची निश्चिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज निश्चितीचा वेग गेल्या तीन दिवसांपासून वाढला आहे. रविवारी दिवसभरात १२५ विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जांची निश्चिती केली. अर्ज निश्चितीसाठी या ठिकाणी गर्दी होत आहे. दूरध्वनी, शिफारसपत्र दिवसाकाठी २० ते २५ जण प्रत्यक्षात भेटून प्रवेशाची मागणी करीत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत किमान ३० ते ४० जणांचे प्रवेशासाठी शिफारस करणारे दूरध्वनी येत आहेत. प्रवेशाच्या अशा स्वरूपातील मागणीने आम्ही हैराण झालो आहोत. गुणवत्तेनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली आहे तरीही, प्रवेशासाठी या पद्धतीने होणारी मागणी त्रासदायक ठरत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. अकरावी प्रवेशाला शिस्त लागावी, त्यातील गैरप्रकार थांबावेत म्हणून केंद्रीय प्रक्रिया राबविली जात आहे. कुणा दादा, भाऊंच्या मागणीने घाबरून न जाता प्राचार्यांनी प्रवेश समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. - प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, प्राचार्य असोसिएशन