शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पाणी चोरीसाठी आता सिंगल फेज यंत्रणा

By admin | Updated: March 16, 2017 00:20 IST

चिकोत्रा खोेऱ्यातील अवस्था : पाटबंधारे विभागाचे अधिकारीच हतबल; उत्तर किनारा तहानलेलाच

दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेचिकोत्रा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यावरच चिकोत्रा खोऱ्यातील ३० ते ३५ गावांची तहान भागते. मात्र, चिकोत्रा धरणामध्येच अपुरा पाणीसाठा होत असल्यामुळे आणि या परिसरात बागायती क्षेत्र वाढल्यामुळे त्याचा परिणाम थेट पिण्याच्या पाण्यावर होत आहे. विशेष म्हणजे या नदीकाठावरील अगदी शेवटच्या टोकावर असणाऱ्या खडकेवाडा, बेळुंकी, गलगले, हमीदवाडा, मेतगे, लिंगनूर (कापशी) या गावांना महिन्यातून केवळ १० ते १२ दिवसच पाणी मिळते आणि इतरवेळी पाण्यासाठी वणवण करावी लागते. यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी काटेकोर नियोजन करीत असून, महावितरणनेही उपसाबंदी करून सहकार्याचे हात पुढे केले आहेत; परंतु आता काही बडे शेतकरी सिंगल फेजवर चालणाऱ्या यंत्रणांचा वापर करून पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे शेवटच्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यात हा नव्याने अडथळा निर्माण झाला असून, त्याच्यावर नियंत्रण आणण्याचे पाटबंधारे व महावितरणसमोर नव्याने आवाहन तयार झाले आहे. शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना होणे गरजेच्या असल्याच्या येथील जनतेच्या भावना आहेत. म्हातारीच्या पठारावर बांध घालून वाया जाणारे पाणी चिकोत्राकडे वळविल्यामुळे यंदा या धरणात अल्पसा पाणीसाठा वाढला आहे. पावसाळ्यानंतर या धरणात ६२ टक्के पाणीसाठा होता. चिकोत्रा नदीतून खडकेवाडा, बेळुंकी पर्यंत २८ कोल्हापुरी बंधारे आहेत. ते भरण्यासाठी प्रत्येक महिन्यातून एकदा पाणी सोडले जाते. म्हणजेच साधारणत: एका आवर्तनाला ९० एम. सी. एफ. टी. इतके पाणी लागते. धरणातून सोडलेले पाणी खडकेवाडा- बेळुंकी बंधाऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू केली जाते. मात्र, काही शेतकरी रात्री- अपरात्री अवैधपणे पाणी उपसा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तर काहीजण राजकीय आश्रय घेऊन अधिकाऱ्यांवरच दबाव तंत्राचा अवलंब करीत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, उपसाबंदी काटेकोर व्हावी यासाठी काही ग्रामस्थांनी आंदोलनेही केली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने मध्यरात्री कार्यवाही करून उपसा सुरू असणारे विद्युत पंप सील केले होते. त्यामुळे या पाण्याचे नियंत्रण व रखवाली करणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारीच (रखवालदार) हतबल होताना दिसत आहेत; परंतु काही अतिहुशार मंडळी थ्री फेजवर उपसाबंदी केल्यामुळे थ्री फेजऐवजी सिंगल फेजवर विद्युत पंप चालणारी यंत्रणा इलेक्ट्रिशियन तज्ज्ञांकडून कार्यरत करून अवैधपणे पाणी उपसा करीत आहेत. त्यामुळे धरणाच्या उत्तरेकडील शेवटच्या टोकाला आवर्तनाचे पाणी मिळायला अधिकच वेळ लागत असून, याबाबत ग्रामस्थांसह येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाचाही लाट उसळली आहे.बागायतीवर मर्यादा हाच एकमेव पर्यायधरणातील अल्प पाणीसाठा आणि या खोऱ्यातील लोकसंख्येचा विचार करता हे पाणी पिण्यासाठीच पुरेसे आहे. त्यातून थोडेफार शिल्लक राहिल्यास शेतीसाठी देता येऊ शकते. मात्र, पाण्याचा अंदाज न घेता उसासारख्या बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पाण्याची शाश्वत उपलब्धता होईपर्यंत बागायती क्षेत्र मर्यादित ठेवणे, तसेच ठिबक सिंचनचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.अशी होते वीज चोरी : चिकोत्राचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासांठी उपसाबंदी केली आहे. या काळात विद्युत पंपाची थ्री फेज कनेक्शन वीजपुरवठा बंद असतो. मात्र, सिंगल फेज सुरू असते. याचा फायदा उठवत काही शेतकऱ्यांनी तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनकडून एका फ्युजला कनव्हर्टर (गट्टू) जोडला जातो. यामुळे याचे रूपांतर थ्री फेजमध्ये होऊन विद्युत पंप नेहमीप्रमाणे पाणी खेचतो. यासाठी ५00 ते एक हजार रूपये इतका नाममात्र खर्च येत असल्याने अनेकांनी हा पर्याय अवलंबिला आहे. तसेच, मोटर पाण्यात असते, त्यामुळे त्याचा आवाज येत नाही.शाश्वत पाण्यासाठी असाही पर्याय...चिकोत्रा खोऱ्याच्या उत्तरेकडील वर्षानुवर्षे अवर्षणग्रस्त असणाऱ्या खडकेवाडा, हमीदवाडा, गलगले, लिंगनूर, बेळुंकी या गावांच्या पिण्याच्या पाण्यासह येथील शेतीच्या पाण्यासाठी वेदगंगा या बारमाही वाहणाऱ्या नदीतून शासकीय पातळीवर अथवा साखर कारखान्यांमार्फत बस्तवडे ते हमीदवाडापर्यंत केवळ (३ कि.मी) एखादी मोठी पाणी योजना करून हमीदवाडा गावच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या ओढ्यापर्यंत पाणी टाकायचे आणि तेथून ते ओढ्यातून थेट चिकोत्रा नदीत मेतगे बंधाऱ्यात पोहोचू शकते. त्यामुळे या अवर्षणग्रस्त भागाला शाश्वत पाण्याची उपलब्धता होऊ शकते. यासाठी येथील शेतकऱ्यांनी एकसंघ होऊन शासनासह कारखानदारांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.