शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कुरुंदवाडचे मुख्याधिकारी बनले 'सिंघम' अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव ...

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालात प्रशासकीय कामकाजातून शिस्त आणि कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी फिके पडले असून मुख्याधिकारी जाधव यांनी दबदबा निर्माण केला आहे.

त्यामुळे मुख्याधिकारी 'सिंघम' अधिकारी म्हणून चर्चेत आहेत.

पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. भाजप विरोधात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये परस्परात सत्तासंघर्ष, समन्वयाच्या अभावामुळे शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे.

मुख्याधिकारी जाधव जुलै २०१९ मध्ये रूजू झाले. अन् प्रलयकारी महापुराचे संकट आले. शहरातील राजकीय, भौगोलिक परिस्थितीची माहिती नसतानाही संयमाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, शासकीय, दातृत्वाकडून आलेल्या मदतीत राजकीय हस्तक्षेप, पक्षपातीपणा थांबवून गरजवंतांपर्यंत पोहोचविल्याने शहरवासीयांची मने जिंकली.

नैसर्गिक संकटातही शहर स्वच्छतेला महत्त्व देत शहरवासीयांना स्वच्छतेत सामावून घेत स्वच्छता मोहीम राबविल्याने गतवर्षी स्वच्छता अभियानात थ्री स्टार मानांकन मिळाले तर यंदा शौचालययुक्त शहर म्हणून ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे.

कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. त्यामुळे काहीवेळा लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले तरी प्रशासकीय बाजू सक्षमपणे मांडल्याने शहरातील कोरोना संख्या नियंत्रित राखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतुकही झाले.