शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कुरुंदवाडचे मुख्याधिकारी बनले 'सिंघम' अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव ...

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालात प्रशासकीय कामकाजातून शिस्त आणि कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी फिके पडले असून मुख्याधिकारी जाधव यांनी दबदबा निर्माण केला आहे.

त्यामुळे मुख्याधिकारी 'सिंघम' अधिकारी म्हणून चर्चेत आहेत.

पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. भाजप विरोधात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये परस्परात सत्तासंघर्ष, समन्वयाच्या अभावामुळे शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे.

मुख्याधिकारी जाधव जुलै २०१९ मध्ये रूजू झाले. अन् प्रलयकारी महापुराचे संकट आले. शहरातील राजकीय, भौगोलिक परिस्थितीची माहिती नसतानाही संयमाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, शासकीय, दातृत्वाकडून आलेल्या मदतीत राजकीय हस्तक्षेप, पक्षपातीपणा थांबवून गरजवंतांपर्यंत पोहोचविल्याने शहरवासीयांची मने जिंकली.

नैसर्गिक संकटातही शहर स्वच्छतेला महत्त्व देत शहरवासीयांना स्वच्छतेत सामावून घेत स्वच्छता मोहीम राबविल्याने गतवर्षी स्वच्छता अभियानात थ्री स्टार मानांकन मिळाले तर यंदा शौचालययुक्त शहर म्हणून ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे.

कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. त्यामुळे काहीवेळा लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले तरी प्रशासकीय बाजू सक्षमपणे मांडल्याने शहरातील कोरोना संख्या नियंत्रित राखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतुकही झाले.