शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडचे मुख्याधिकारी बनले 'सिंघम' अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव ...

कुरुंदवाड : पालिकेत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाच्या अभावामुळे गेल्या साडेचार वर्षांत शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालात प्रशासकीय कामकाजातून शिस्त आणि कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी फिके पडले असून मुख्याधिकारी जाधव यांनी दबदबा निर्माण केला आहे.

त्यामुळे मुख्याधिकारी 'सिंघम' अधिकारी म्हणून चर्चेत आहेत.

पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. भाजप विरोधात आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये परस्परात सत्तासंघर्ष, समन्वयाच्या अभावामुळे शहराच्या विकासाला ‘ब्रेक’ मिळाला आहे.

मुख्याधिकारी जाधव जुलै २०१९ मध्ये रूजू झाले. अन् प्रलयकारी महापुराचे संकट आले. शहरातील राजकीय, भौगोलिक परिस्थितीची माहिती नसतानाही संयमाने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, शासकीय, दातृत्वाकडून आलेल्या मदतीत राजकीय हस्तक्षेप, पक्षपातीपणा थांबवून गरजवंतांपर्यंत पोहोचविल्याने शहरवासीयांची मने जिंकली.

नैसर्गिक संकटातही शहर स्वच्छतेला महत्त्व देत शहरवासीयांना स्वच्छतेत सामावून घेत स्वच्छता मोहीम राबविल्याने गतवर्षी स्वच्छता अभियानात थ्री स्टार मानांकन मिळाले तर यंदा शौचालययुक्त शहर म्हणून ओडीएफ डबल प्लस मानांकन मिळाले आहे.

कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. त्यामुळे काहीवेळा लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले तरी प्रशासकीय बाजू सक्षमपणे मांडल्याने शहरातील कोरोना संख्या नियंत्रित राखण्यात यश मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची जिल्हाधिकारी यांच्याकडून कौतुकही झाले.