शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गैरव्यवहारांच्या आरोपांनी सिंग सरकार कोसळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:14 IST

- वसंत भोसले स्वच्छ चारित्र्याचे, संयमी, विद्वान अशी प्रतिमा असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली. ...

- वसंत भोसलेस्वच्छ चारित्र्याचे, संयमी, विद्वान अशी प्रतिमा असलेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली. पहिली पाच वर्षे ही (२००४ ते २००९) देशाच्या आर्थिक उन्नतीची होती. त्याच प्रतिमेच्या आधारे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने बहुमत मिळविले. डाव्या आघाडीच्या अणुकरारावरून विरोध सहन केलेल्या संपुआला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागला. त्यात जनता दल व द्रमुकचा वाटा मोठा होता. पहिली दोन-तीन वर्षे चांगली गेली. मात्र, टू-जी घोटाळा, निर्भया प्रकरण, काळा पैसा, लोकपालसाठी आंदोलन, आम आमदी पक्षाचा उदय आणि त्यांनी उभारलेले आंदोलन, आदी कारणांनी मनमोहन सिंग सरकारची प्रतिमा काळवंडू लागली. टू जी प्रकरणात द्रमुकचे मंत्री अटकेत गेले. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांतून सरकारच्या कामगिरीवर रोजच टीकेचा भडीमार सुरू झाला. याचे परिणाम तर होणार होतेच. पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भूमिका घेण्याचे नाकारत मौन पाळले. त्याचाही फटका बसला. सरकारची प्रतिमा खालावत जाऊ लागली. पहिल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीने ‘सिंग इज किंग’ ठरलेले मनमोहन सिंग यांनी राजकीय भूमिका घेण्याचे नाकारल्याने ते अपघातानेच पंतप्रधान झाले का? अशी चर्चा सुरू झाली. हा सर्व गदारोळ चालू असला तरी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप विरोधकांना वा माध्यमांना करता आला नाही. त्यांचा वैयक्तिक व्यवहार स्वच्छ होता. मात्र, मंत्रिमंडळाचे आणि सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर नैतिक जबाबदारी पडत होती.लोकपालच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाने सरकारविरुद्ध देशभर वातावरण तयार झाले. अशावेळी राजकीय हालचाली करून तोडगा काढण्यात मनमोहन सिंग कमी पडले. सोनिया गांधी यांनीही पुढाकार घेतला नाही. परिणामी, विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. भाजपने याचा वापर मोठ्या प्रमाणात केला. दरम्यान, २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यश मिळविले.त्यानंतर त्यांनी देशभरातील काँग्रेसविरोधी वातावरणाचा लाभ उठवित राष्ट्रीय राजकारणात येण्याची तयारी चालविली. त्यासाठी पक्ष कार्यकारिणीची मान्यता घेतली. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज, आदींचा विरोध डावलून नरेंद्र मोदी यांनी आपले नाव पुढे रेटले. तो प्रयोग यशस्वी करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनीही मदतीचा हात पुढे केला. टू जी घोटाळ्याने वाटोळे झाले, असा आरोपही करण्यात आला. अर्थात तो घोटाळा कागदावरील आकड्यातच राहिला.पुढे सरकार बदलल्यानंतर एकाही प्रकरणाची तड लागली नाही. चौकशीचे नाटक मात्र झाले. दुससरीकडे भाजपच्या मोहिमेला मध्यमवर्गातून तसेच शहरी भागांतून चांगला प्रतिसाद मिळत राहिला. याच वर्गाने २००९ मध्ये मनमोहन सिंग यांना ‘किंग’ बनविले होते. पण आता नेमकी उलटी परिस्थिती तयार झाली होती. त्याचा भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खुबीने वापर करून घेतला.उद्याच्या अंकात ।नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भाजपला प्रथमच बहुमत