शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कर्जमाफीच्या निकषाबाबत सावळा गोंधळ

By admin | Updated: June 13, 2017 01:06 IST

अनेक मुद्द्यांबाबत अस्पष्टता : कर्जमर्यादा, काळ निश्चितता, नव्या कर्जपुरवठ्याबाबतचे प्रश्न अनुत्तरितच

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राज्य सरकारने घाईगडबडीत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, पण त्याचबाबतच्या निकषावरून शेतकऱ्यांसह बँकांच्या पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. कधीपर्यंतचे कर्ज माफ होणार? कर्जमर्यादेचा निकष लावणार का? याची स्पष्टता नाही. त्याचबरोबर सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होणार असल्याचे सरकारने जाहीर केले खरे, पण बॅँकिंग नियमानुसार थकीत रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्जपुरवठा करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. शेतकरी विकास संस्थेच्या माध्यमातून दोन-तीन प्रकारची कर्जे उचलतो. सरकारने पीककर्जाबरोबर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर थकीत असलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ करणार का? याविषयी स्पष्टता नाही. सरकारने माहिती मागवताना मार्च २०१७ अखेर थकीत शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे; पण कर्जमाफी जाहीर करताना कोणत्या कालावधीपर्यंतचे कर्ज माफ हे न सांगितल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांच्या (पान ४ वर)कर्ज मागणीसाठी शेतकरी जिल्हा बँकेतसरकारने सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू होणार असून बॅँकेतून खरीप कर्जाची उचल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखांत जाऊन कर्जाची मागणी केली; पण रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार थकबाकीदाराला कर्ज देता येत नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हिरमुसल्या चेहऱ्याने शेतकरी परतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा बँकेला ‘येणे-देणे’चा अनुभव वाईटकेंद्र सरकारच्या २००८ मधील कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या खात्याला जमा व सरकारकडून येणे दाखविले होते, पण ‘नाबार्ड’च्या तपासणीत ११२ कोटी अपात्र ठरविल्याने या जमा-खर्चाने जिल्हा बँक अडचणीत आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने जरी कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्हा बँक ‘येणे-देणे’च्या नादाला लागणार नाही. पीक व मध्यम मुदतीचा सर्वाधिक कर्जपुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून होतो. पाच एकरांच्या आतील ४९ हजार ६९७ तर पाच एकरांवरील ३७८४ असे ५३ हजार ४८१ थकबाकीदार शेतकरी आहेत; पण नियमित कर्जपुरवठा करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पाच एकरांच्या आतील व वरील २ लाख १५ हजार ९०६ शेतकरी आहेत. निकषाऐवजी निकड पाहालोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अल्पभूधारक या निकषापेक्षा त्या शेतकऱ्याची निकड पाहणे आवश्यक आहे. कारण आम्ही आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नेतृत्व करतो आहोत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. मुंबई येथे उच्चस्तरीय मंत्रिगटाबरोबर रविवारी (दि. ११) शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाल्यानंतर सोमवारी खासदार शेट्टी इचलकरंजीत आले असताना शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे वार्षिक उलाढाल असलेले बॅँक खाते तपासावे. ज्यामुळे त्याला असलेली आर्थिक निकड लक्षात येईल. अशा प्रकारच्या तपासण्या करून नुकसानीमध्ये जाऊन कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निकष (पान ४ वर)