शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

कर्जमाफीच्या निकषाबाबत सावळा गोंधळ

By admin | Updated: June 13, 2017 01:06 IST

अनेक मुद्द्यांबाबत अस्पष्टता : कर्जमर्यादा, काळ निश्चितता, नव्या कर्जपुरवठ्याबाबतचे प्रश्न अनुत्तरितच

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राज्य सरकारने घाईगडबडीत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, पण त्याचबाबतच्या निकषावरून शेतकऱ्यांसह बँकांच्या पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. कधीपर्यंतचे कर्ज माफ होणार? कर्जमर्यादेचा निकष लावणार का? याची स्पष्टता नाही. त्याचबरोबर सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होणार असल्याचे सरकारने जाहीर केले खरे, पण बॅँकिंग नियमानुसार थकीत रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्जपुरवठा करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे. शेतकरी विकास संस्थेच्या माध्यमातून दोन-तीन प्रकारची कर्जे उचलतो. सरकारने पीककर्जाबरोबर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर थकीत असलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ करणार का? याविषयी स्पष्टता नाही. सरकारने माहिती मागवताना मार्च २०१७ अखेर थकीत शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे; पण कर्जमाफी जाहीर करताना कोणत्या कालावधीपर्यंतचे कर्ज माफ हे न सांगितल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांच्या (पान ४ वर)कर्ज मागणीसाठी शेतकरी जिल्हा बँकेतसरकारने सोमवारपासून थकीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू होणार असून बॅँकेतून खरीप कर्जाची उचल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखांत जाऊन कर्जाची मागणी केली; पण रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार थकबाकीदाराला कर्ज देता येत नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हिरमुसल्या चेहऱ्याने शेतकरी परतल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा बँकेला ‘येणे-देणे’चा अनुभव वाईटकेंद्र सरकारच्या २००८ मधील कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या खात्याला जमा व सरकारकडून येणे दाखविले होते, पण ‘नाबार्ड’च्या तपासणीत ११२ कोटी अपात्र ठरविल्याने या जमा-खर्चाने जिल्हा बँक अडचणीत आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने जरी कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्हा बँक ‘येणे-देणे’च्या नादाला लागणार नाही. पीक व मध्यम मुदतीचा सर्वाधिक कर्जपुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून होतो. पाच एकरांच्या आतील ४९ हजार ६९७ तर पाच एकरांवरील ३७८४ असे ५३ हजार ४८१ थकबाकीदार शेतकरी आहेत; पण नियमित कर्जपुरवठा करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. पाच एकरांच्या आतील व वरील २ लाख १५ हजार ९०६ शेतकरी आहेत. निकषाऐवजी निकड पाहालोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अल्पभूधारक या निकषापेक्षा त्या शेतकऱ्याची निकड पाहणे आवश्यक आहे. कारण आम्ही आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नेतृत्व करतो आहोत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. मुंबई येथे उच्चस्तरीय मंत्रिगटाबरोबर रविवारी (दि. ११) शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची बैठक झाल्यानंतर सोमवारी खासदार शेट्टी इचलकरंजीत आले असताना शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे वार्षिक उलाढाल असलेले बॅँक खाते तपासावे. ज्यामुळे त्याला असलेली आर्थिक निकड लक्षात येईल. अशा प्रकारच्या तपासण्या करून नुकसानीमध्ये जाऊन कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निकष (पान ४ वर)