शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

ऊसदराबाबत कारखानदारांचे मौन, संघटनांही मवाळ

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

संघटनांचा धाक कमी : ऊस उत्पादकांचे लक्ष; शेतकऱ्यांमध्येही निराशा

प्रकाश पाटील -कोपार्डे -गेल्या तेरा वर्षांत शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळविण्यासाठी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांवर धाक निर्माण केला होता. मात्र, विधानसभेत आलेल्या अपयशाचे पडसाद संघटनांच्या यावर्षीच्या आक्रमकतेवर स्पष्ट दिसून येत असून, संघटनांच्या मवाळ भूमिकेमुळे यंदा प्रथमच ऊसदर जाहीर न करताच कारखानदारांकडून नेटाने गाळप हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र निराश झाल्याचे चित्र दिसत आहे. २००१ पासून राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटित नेतृत्व आपल्या हातात घेतल्यानंतर कारखानदारांवर ऊसदराबाबत हंगाम सुरू करण्याअगोदर दर जाहीर करण्याचा धाक होता. यातून शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची संकल्पना आणली. हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांना त्या हंगामात किती दर हवा आहे, याची घोषणा केली जायची. यानंतर ऊस परिषदेच्या जाहीर झालेल्या दरावर तोडगा काढल्याशिवाय कारखानदारांत हंगाम सुरू करण्याचे धाडस नसायचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला कोल्हापूरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकच्या सीमाभागातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. कारखानदार ऊस तोडणी घेऊन दारात आले, तरी शेतकरी आपल्या उसाला खासदार शेट्टींच्या ऊस दराबाबत तडजोड झाल्याशिवाय कोयता लावू देत नव्हते आणि एखाद्या कारखानदाराने आपले राजकीय वजन वापरून हंगाम चालू केला, तर जिवाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर लढाई करायचे. मात्र, यावर्षी विधानसभेत संघटनेला आलेल्या अपयशाचे पडसाद ऊस परिषदेत स्पष्ट दिसले. २७०० रुपये दर जाहीर करण्यापासून हा दर मिळविण्यासाठी कारखानदारांना २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेला अल्टिमेटम् यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच काळेबेरे असल्याचे दिसल्याने व त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या आक्रमक भूमिकेचा अभाव दिसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण दिसू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन असताना राजू शेट्टी यांनी बारामती, इंदापूर, कऱ्हाड अशी आंदोलने करून शासन व कारखानदारांना ‘सळो की पळो’ करून सोडले. मात्र, सत्तेत सहभागी होताच विश्वामित्री पवित्रा घेऊन ऊसदराबाबत मवाळ भूमिका घेऊन ज्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले त्यांच्या मनामध्ये शंकेला जागा निर्माण झाली आहे. यावर्षी कारखानदारांनी संघटनेची भूमिका पाहून सावध पवित्रा घेत ऊसदराबाबत मौन बाळगतच हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. राजू शेट्टी यांची आजपर्यंतची भूमिका व यावर्षीची भूमिका शेतकऱ्यांना निराश करायला लावणारी आहे. तीन हजारांच्या दराचा इशारा दिला असता, तर कुठे निर्ढावलेले कारखानदार वठणीवर आले असते. प्रत्येक वर्षी खतांचे दर वाढत असताना २७०० ची मागणी हास्यास्पद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या राजू शेट्टींनी आता सत्तेत येताच घुमजाव भूमिका घेतलीय. - कृष्णात पाटील, शेतकरी, वाकरे,ता. करवीरसंघटनेने दर जाहीर करायचा आणि कारखानदारांनी तो द्यावयाचा हे किती दिवस चालणार ? आज स्वत: कारखानदारांनी ऊसदर जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. २९०० दर घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. - विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना कार्यकर्ते, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा