शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऊसदराबाबत कारखानदारांचे मौन, संघटनांही मवाळ

By admin | Updated: November 7, 2014 23:33 IST

संघटनांचा धाक कमी : ऊस उत्पादकांचे लक्ष; शेतकऱ्यांमध्येही निराशा

प्रकाश पाटील -कोपार्डे -गेल्या तेरा वर्षांत शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळविण्यासाठी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील या संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांवर धाक निर्माण केला होता. मात्र, विधानसभेत आलेल्या अपयशाचे पडसाद संघटनांच्या यावर्षीच्या आक्रमकतेवर स्पष्ट दिसून येत असून, संघटनांच्या मवाळ भूमिकेमुळे यंदा प्रथमच ऊसदर जाहीर न करताच कारखानदारांकडून नेटाने गाळप हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र निराश झाल्याचे चित्र दिसत आहे. २००१ पासून राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटित नेतृत्व आपल्या हातात घेतल्यानंतर कारखानदारांवर ऊसदराबाबत हंगाम सुरू करण्याअगोदर दर जाहीर करण्याचा धाक होता. यातून शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेची संकल्पना आणली. हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांना त्या हंगामात किती दर हवा आहे, याची घोषणा केली जायची. यानंतर ऊस परिषदेच्या जाहीर झालेल्या दरावर तोडगा काढल्याशिवाय कारखानदारांत हंगाम सुरू करण्याचे धाडस नसायचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला कोल्हापूरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून तसेच कर्नाटकच्या सीमाभागातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. कारखानदार ऊस तोडणी घेऊन दारात आले, तरी शेतकरी आपल्या उसाला खासदार शेट्टींच्या ऊस दराबाबत तडजोड झाल्याशिवाय कोयता लावू देत नव्हते आणि एखाद्या कारखानदाराने आपले राजकीय वजन वापरून हंगाम चालू केला, तर जिवाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर लढाई करायचे. मात्र, यावर्षी विधानसभेत संघटनेला आलेल्या अपयशाचे पडसाद ऊस परिषदेत स्पष्ट दिसले. २७०० रुपये दर जाहीर करण्यापासून हा दर मिळविण्यासाठी कारखानदारांना २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेला अल्टिमेटम् यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच काळेबेरे असल्याचे दिसल्याने व त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून आवश्यक असणाऱ्या आक्रमक भूमिकेचा अभाव दिसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण दिसू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन असताना राजू शेट्टी यांनी बारामती, इंदापूर, कऱ्हाड अशी आंदोलने करून शासन व कारखानदारांना ‘सळो की पळो’ करून सोडले. मात्र, सत्तेत सहभागी होताच विश्वामित्री पवित्रा घेऊन ऊसदराबाबत मवाळ भूमिका घेऊन ज्या शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले त्यांच्या मनामध्ये शंकेला जागा निर्माण झाली आहे. यावर्षी कारखानदारांनी संघटनेची भूमिका पाहून सावध पवित्रा घेत ऊसदराबाबत मौन बाळगतच हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. राजू शेट्टी यांची आजपर्यंतची भूमिका व यावर्षीची भूमिका शेतकऱ्यांना निराश करायला लावणारी आहे. तीन हजारांच्या दराचा इशारा दिला असता, तर कुठे निर्ढावलेले कारखानदार वठणीवर आले असते. प्रत्येक वर्षी खतांचे दर वाढत असताना २७०० ची मागणी हास्यास्पद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट करणाऱ्या राजू शेट्टींनी आता सत्तेत येताच घुमजाव भूमिका घेतलीय. - कृष्णात पाटील, शेतकरी, वाकरे,ता. करवीरसंघटनेने दर जाहीर करायचा आणि कारखानदारांनी तो द्यावयाचा हे किती दिवस चालणार ? आज स्वत: कारखानदारांनी ऊसदर जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती. २९०० दर घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. - विठ्ठल पाटील, शेतकरी संघटना कार्यकर्ते, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा