शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार !

By admin | Updated: December 6, 2015 00:03 IST

ऐतिहासिक दस्तावेजाचा सन्मान : साताऱ्याच्या शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी केली होती सही

प्रदीप यादव / सातारा ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतला. या ऐतिहासिक घटनेला आता ११५ वर्षे होत आहेत. प्रवेश घेतेवेळी आंबेडकरांनी मोडी लिपीमध्ये केलेली स्वाक्षरी १ हजार ११४ व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना ज्या बंगल्यात वास्तव्यास होते, ते निवासस्थान नुकतेच भारत सरकारने ताब्यात घेतले आहे. या निवासस्थानात संग्रहालय होणार असून, त्यामध्ये डॉ. आंबेडकरांची पहिली स्वाक्षरी झळकणार आहे. यासाठी गेली १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळ्याचे आयोजन करणारे सामाजिक, वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते अरुण जावळे प्रयत्न करीत आहेत. या स्वाक्षरीने बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया साताऱ्यात भक्कम करून पुढे ते यशस्वीपणे शिकत राहिले. विदेशातल्या विद्यापीठांमध्ये आपल्या ज्ञानाचा अमीट ठसा उमटविला. जगद्विख्यात झाले. म्हणूनच ‘नॉलेज आॅफ सिम्बॉल’ ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्वाक्षरीला एक आगळंवेगळंं महत्त्व आहे. भारत सरकारने डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या प्रत्येक स्मृती जतन करण्याचे धोरण अवलंबले आहे. सातारच्या मातीमध्ये डॉ. आंबेडकरांसारखा युगपुरुष शिकला, बागडला. याच मातीमध्ये त्यांनी वास्तव्य केले. या घटना सातारकरांचे ऊर भरून आणणाऱ्या अशाच आहेत. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि या स्वाक्षरीलाही आपण सलामच करायला हवा, असे मत अरुण जावळे यांनी व्यक्त केले. हा तर साताराभूमीचा गौरव आता या स्वाक्षरीला जागतिक अशा स्वरूपाचे महत्त्व प्राप्त होणार असून, जगभरातील आंबेडकर अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळाप्रवेशाच्या दरम्यानची स्वाक्षरी लंडन येथे पाहावयास मिळणार आहे. एका अर्थाने हा सातारच्या भूमीचा, भीमाईभूमीचा गौरव आहेच; परंतु प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्व उभे करणाऱ्या महामानवाचाही अभिमान वाटणार आहे. ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं, या देशाला संहिता दिली, नव्हे तर त्या संहितेमुळे जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी लोकशाही प्रणाली निर्माण केली, अशा संविधान शिल्पकाराच्या स्वाक्षरीला म्हणूनच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.