शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शुक्रवारी ग्रामविकासमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

म्हाकवेः निपाणी-देवगड या तीन वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या रस्त्यासाठी कागल तालुक्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अमित ...

म्हाकवेः निपाणी-देवगड या तीन वर्षांपासून रेंगाळत पडलेल्या रस्त्यासाठी कागल तालुक्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अमित पाटील यांना धारेवर धरत लिंगनुर-कापशी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. यावेळी अभियंता संभाजी माने यांना दूरध्वनीवरून नागरिकांनी संपर्क केला. मात्र, त्यांनी असमाधानकारक, बेजबाबदार आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच भेटण्याची वेळही दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा पारा चढला असून शुक्रवार दि.२ रोजी गैबी चौकात ठिय्या आंदोलन व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

निपाणी-देवगड रस्त्याचे काम अर्धवटच राहिल्याने ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून स्थानिक नागरिकांची कुचंबना होत आहे. लिंगनुरसह या मार्गावरील खडकेवाडा, सोनगे, कुरुकली, सुरुपली, मुरगुड, निढोरी, आदमापूर या गावातील स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत.

सुमारे २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर असणाऱ्या या रस्त्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, झालेले कामही निकृष्ट आणि निरुपयोगी असल्याचे नागरिकांनी अधिका-यांना दाखवून दिले. यावेळी काॅ. शिवाजी मगदूम, सरपंच स्वप्निल कांबळे, माजी सरपंच मयूर आवळेकर, डॉ. प्रवीण जाधव, शिवाजी मेथे, हरिदास पोवार, नामदेव भोसले, तुषार किल्लेदार, जोतिराम मोगणे (हमिदवाडा), राजू आरडे (आणूर) संदेश जाधव, अविनाश पोवार, गुंडूराव आवळेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

अधिकारी, ठेकेदार समोर का येत नाहीत?

दोन वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर असून नागरिकांच्या जीवांशी खेळ सुरू आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य ठेकेदार मनावर घेत नाहीत. उलट ही मंडळी नामानिराळे राहून कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी सोपवत आहेत. त्यामुळे दूरध्वनीवरून अभियंता संभाजी माने यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी उद्धट बोलत बाजू झटकली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना याबाबत घेराव घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे काॅ. मगदूम यांनी सांगितले.