शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

रस्त्यावर फूटपाथ व मिळकतधारकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

अरुंद रस्ते व अडथळे कायम अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अनेक मुख्य रस्त्यांलगत गरज नसतानाही फूटपाथ ...

अरुंद रस्ते व अडथळे कायम

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील अनेक मुख्य रस्त्यांलगत गरज नसतानाही फूटपाथ उभारण्यात आले आहेत. या फूटपाथांमुळे वाहतुकीत सुधारणा होण्याऐवजी बिघाडच झाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी फूटपाथवर पथविक्रेते व वाहन पार्किंग असे अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच काही मिळकतधारकांनीही रस्त्यावरच लोखंडी जिना, पार्किंग शेड, पाणी तापविण्यासाठी चुली असे अतिक्रमण केले आहे. वर्षानुवर्षे हे अतिक्रमण कायम आहे.

शहरात राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून पंधरा कोटी ६३ लाख रुपयांचा निधी खर्चून मुख्य मार्गाच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मार्गक्रमण करताना वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना अडथळा येऊ नये, अपघात होऊ नये, या उद्देशाने हे फूटपाथ निर्माण करण्यात आले असले तरी त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आला. अनेक ठिकाणी फूटपाथसमोर पथविक्रेत्यांनी अतिक्रमण केले, तर गाळेधारकांसमोर असलेल्या फूटपाथवर मोटारसायकलींचे पार्किंग सुरू झाले. काही ठिकाणी मुख्य मार्गाला फूटपाथच अडथळा ठरला. तसेच फूटपाथच्या बाहेर वाहनांचे पार्किंग होऊ लागल्याने वाहतुकीसाठी चिंचोळा मार्ग राहू लागला. त्यातून अपघातास निमंत्रण मिळू लागले.

याकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक होते. अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत वेळोवेळी कारवाई करत फूटपाथवरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. परंतु अतिक्रमण विभागाकडून जुजबी कारवाईव्यतिरिक्त ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.

त्याचबरोबर शहरातील अनेक मिळकतधारकांनी गटारीबाहेर रस्त्यावर वरील मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी व काहींनी कॉंक्रीटचे जिने बसविले आहेत. काहींनी कार पार्किंगसाठी शेड उभारली, अनेकांनी पाणी तापविण्यासाठी दारात रस्त्यावर चुली, बंब यासाठी रस्ता व्यापला. गल्लोगल्ली असे प्रकार सर्रासपणे दिसून येतात. याविरोधात गल्लीतील कोणी आवाज उठविल्यास शहरात झालेली मोठमोठी अतिक्रमणे दिसत नाहीत. फक्त हेच दिसते, असा वाद - विवाद घातला जातो. संबंधित विभागातील नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अशा अतिक्रमणांना रोखून वेळीच अतिक्रमण काढून घेणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे त्यांचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्यातून अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत जाऊन आतील अनेक मार्गही चिंचोळे बनले आहेत. विभागानुसार अशा अतिक्रमणांना काढण्याची मोहीम राबवून शहराला अतिक्रमणमुक्त बनवणे गरजेचे बनले आहे.

(फोटो ओळी)

इचलकरंजीत फूटपाथावर पथविक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे.

(छाया : उत्तम पाटील)