शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

‘सिद्धाळा गार्डन’मध्ये सर्वाधिक ८९ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 01:10 IST

आयुक्तांची माहिती : सर्वांत कमी मतदान उच्चभ्रू ताराबाई पार्कमध्ये : महिलांचाही टक्का वाढला

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन प्रभागात सर्वाधिक ८८.५५ टक्के मतदान, तर ताराबाई पार्क प्रभागात नेहमीप्रमाणे सर्वांत कमी ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी व आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी रात्री पत्रकारांना दिली. मतदानामध्ये एकही बोगस मतदानाची व मतदार यादीवरील हरकतीची तक्रार आलेली नाही. एकूणच प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावा आयुक्तांनी केला. आयुक्त म्हणाले, शाहू कॉलेज प्रभागात (क्रमांक १०) मतदार अखेरच्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्याने सायंकाळी साडेसातपर्यंत तिथे मतदान सुरू राहिले. दोन मतदान केंद्रांतील अंतर दोन किमीपेक्षा जास्त असू नये, असा निवडणूक आयोगाचा आदेश आहे. त्यानुसार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रे लांब असल्यामुळे मतदानास विलंब झाला, असे म्हणता येत नाही. जुने पुढे... शिकलेले मागे... जुन्या कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन प्रभाग व शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान (८५.३० टक्के) या दोन प्रभागांत शहरातील सर्वाधिक मतदान झाले; तर ताराबाई पार्क व नागाळा पार्क प्रभागात सर्वांत कमी (५६.०९ टक्के) मतदान झाले. सिद्धाळा गार्डन हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित प्रभाग आहे. तिथे पंचरंगी लढत होत आहे. जवळच मतदान केंद्र व निवडणुकीत कोणताही तणाव नसल्याने तिथे सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. पद्माराजे गार्डन प्रभाग हा खुला असल्याने तिथे शहरातील सर्वाधिक चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे तिथे मतदारांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा लावल्याने जास्त मतदान झाले. याउलट ताराबाई पार्क, नागाळा पार्क हा सुशिक्षित भाग असल्याने तिथे उमेदवारांना यंत्रणा लावून मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा येतात. त्यातही ‘आम्ही मतदान नाही केले तर त्यामुळे काय बिघडणार आहे?’ अशी मानसिकताही उच्चभ्रू लोकांची असते. पैशाच्या, चिखलफेकीबद्दलही त्यांच्या मनांत घृणा असते त्यामुळे तो मतदानासाठी बाहेर पडत नाही.