शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

इचलकरंजीला लॉकडाऊनला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST

इचलकरंजी : राज्य शासनाने बुधवारी (दि. १४) सायंकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार गुरुवारी शहरात ...

इचलकरंजी : राज्य शासनाने बुधवारी (दि. १४) सायंकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार गुरुवारी शहरात अत्यावश्यक सेवा, बॅँका, एटीएम, रिक्षा, सरकारी कार्यालये, वाहतूक वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुख्य मार्गावर तुरळक गर्दी दिसत होती; परंतु अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ तसेच अनावश्यक गर्दी दिसत होती. त्यामुळे नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र होते.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्र राज्यात आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात बुधवारी सायंकाळपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्य मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली.

किराणा दुकान, बेकरी, भाजीपाला व फळफळावळ यांची विक्री सुरू होती. काही नागरिक शहरात अजूनही मास्क न वापरता फिरत होते. यावेळी वाहतूक पोलीस विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांची चौकशी करत होते. शहर व परिसरात नियमांचे पालन करून काही यंत्रमागधारकांनी आपले उद्योग सुरू ठेवले होते. मुख्य मार्गावर बंद दिसत असला तरी अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी दुकाने सुरू होती. तसेच मोठी वर्दळ होती.

फोटो ओळी

१५०५२०२१-आयसीएच-०२

नेहमी गजबजलेल्या के. एल. मलाबादे चौकात शुकशुकाट होता.

१५०५२०२१-आयसीएच-०३

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानगाळे बंद होते.

१५०५२०२१-आयसीएच-०४ फळ मार्केटमध्ये तुरळक गर्दी होती.

सर्व छाया-उत्तम पाटील