शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

By admin | Updated: September 23, 2016 00:37 IST

जिल्हा परिषदेची जागा असल्याचा आरोप : बांधकाम हटविण्याची नगरपालिकेला नोटीस; गाळेधारक ‘आंदोलन अंकुश’च्या रडारवर

गणपती कोळी-- कुरुंदवाडयेथील माळभागावरील जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिका शहरातील व्यावसायिकांना दुकानगाळे बांधून देत आहे. मात्र, पालिका व्यावसायिकांना बेकायदेशीर दुकानगाळे बांधून देत असल्याने ‘आंदोलन अंकुश’ने चौकशीचा ससेमीरा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची नोटीस नगरपालिकेला दिल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले असून, गाळेधारक आता आंदोलन अंकुशच्या रडारवर आहेत. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नगरसेवक, आघाडी नेते शहरवासीयांना खूश करण्यासाठी व राजकीय लाभ उठविण्यासाठी विविध निर्णय घेत आहेत. शहरवासीय मागेल तो ठराव कायदेशीर बाबींचा विचार न करता पालिका सभेत मंजूर करत आहेत. शहरातील छोटे व्यावसायिक व चर्मकार समाजाने पालिकेकडे दुकानगाळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार माळभागावरील एस.पी. हायस्कूललगत असलेली जागा देण्याचा ठराव जुलै महिन्याच्या विशेष सभेत करण्यात आला.मात्र, दुकानगाळ्यांसाठी देण्यात आलेली जागा मुळात जिल्हा परिषद हद्दीत येते. त्यामुळे तेथील जागा व्यावसायिकांना न देता पालिका हद्दीत देण्याची मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेश कडाळे यांनी केली होती. त्यावेळी या विषयावरून खडाजंगी होऊन बहुमताच्या जोरावर व्यावसायिकांना त्याच ठिकाणी जागा देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानगाळे उभारण्याचे काम चालू असून, ते पूर्णत्वासही आले आहे.सध्या या जागेत ८ बाय ६ आकाराचे ३० दुकानगाळे उभारण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ चव्हाण यांनी जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिकेने दुकानगाळे बांधल्याने ‘आंदोलन अंकुश’ला सोबत घेऊन चौकशी लावली आहे. आंदोलन अंकुश ही सामाजिक संघटना असून, एखादा विषय घेतला तर त्याची पूर्ण निर्गत लावल्याशिवाय शांत होत नाही. शिवाय कोणत्याही आमिषाला बळी न पडणारी संघटना अशी प्रतिमा निर्माण केल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये या संघटनेचा मोठा दबदबा आहे.गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार‘आंदोलन अंकुश’ संघटनेने या बेकायदेशीर कामाची चौकशी लावल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नगरपालिकेला लेखी नोटीस देऊन जिल्हा परिषद हद्दीत बांधलेले दुकानगाळे काढून घेण्यास सांगितल्याने गाळेधारकांत खळबळ उडाली आहे. पालिका निवडणूक कधीही जाहीर होणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावरच गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने नगरसेवक, आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.