शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमधील दुकानगाळे वादात

By admin | Updated: September 23, 2016 00:37 IST

जिल्हा परिषदेची जागा असल्याचा आरोप : बांधकाम हटविण्याची नगरपालिकेला नोटीस; गाळेधारक ‘आंदोलन अंकुश’च्या रडारवर

गणपती कोळी-- कुरुंदवाडयेथील माळभागावरील जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिका शहरातील व्यावसायिकांना दुकानगाळे बांधून देत आहे. मात्र, पालिका व्यावसायिकांना बेकायदेशीर दुकानगाळे बांधून देत असल्याने ‘आंदोलन अंकुश’ने चौकशीचा ससेमीरा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची नोटीस नगरपालिकेला दिल्याने गाळेधारकांचे धाबे दणाणले असून, गाळेधारक आता आंदोलन अंकुशच्या रडारवर आहेत. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नगरसेवक, आघाडी नेते शहरवासीयांना खूश करण्यासाठी व राजकीय लाभ उठविण्यासाठी विविध निर्णय घेत आहेत. शहरवासीय मागेल तो ठराव कायदेशीर बाबींचा विचार न करता पालिका सभेत मंजूर करत आहेत. शहरातील छोटे व्यावसायिक व चर्मकार समाजाने पालिकेकडे दुकानगाळ्यांची मागणी केली होती. त्यानुसार माळभागावरील एस.पी. हायस्कूललगत असलेली जागा देण्याचा ठराव जुलै महिन्याच्या विशेष सभेत करण्यात आला.मात्र, दुकानगाळ्यांसाठी देण्यात आलेली जागा मुळात जिल्हा परिषद हद्दीत येते. त्यामुळे तेथील जागा व्यावसायिकांना न देता पालिका हद्दीत देण्याची मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेश कडाळे यांनी केली होती. त्यावेळी या विषयावरून खडाजंगी होऊन बहुमताच्या जोरावर व्यावसायिकांना त्याच ठिकाणी जागा देण्याचा ठराव केला होता. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानगाळे उभारण्याचे काम चालू असून, ते पूर्णत्वासही आले आहे.सध्या या जागेत ८ बाय ६ आकाराचे ३० दुकानगाळे उभारण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ चव्हाण यांनी जिल्हा परिषद हद्दीत नगरपालिकेने दुकानगाळे बांधल्याने ‘आंदोलन अंकुश’ला सोबत घेऊन चौकशी लावली आहे. आंदोलन अंकुश ही सामाजिक संघटना असून, एखादा विषय घेतला तर त्याची पूर्ण निर्गत लावल्याशिवाय शांत होत नाही. शिवाय कोणत्याही आमिषाला बळी न पडणारी संघटना अशी प्रतिमा निर्माण केल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधींमध्ये या संघटनेचा मोठा दबदबा आहे.गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार‘आंदोलन अंकुश’ संघटनेने या बेकायदेशीर कामाची चौकशी लावल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नगरपालिकेला लेखी नोटीस देऊन जिल्हा परिषद हद्दीत बांधलेले दुकानगाळे काढून घेण्यास सांगितल्याने गाळेधारकांत खळबळ उडाली आहे. पालिका निवडणूक कधीही जाहीर होणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावरच गाळेधारकांचा प्रश्न गंभीर बनणार असल्याने नगरसेवक, आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.