शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

दुकानदार, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी ...

कोल्हापूर : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी व दुकानदारांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे, यावेळीही करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शुक्रवारी केले. व्यावसायिकांच्या नुकसानीची आम्हाला कल्पना असून काही पॅकेज देता येते का यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

राज्यातील अन्य शहरांमध्ये अनलॉक झाले आहे, मात्र कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांना दुपारी चारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध हटवू नका, अशी सूचना केली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र सोमवारपासून आम्ही दुकाने सुरू करणार प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभुमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

ते म्हणाले, गेले दीड वर्षे परिस्थिती अतिशय वाईट आहे. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे याची आम्हाला जाणीव आहे. सध्या चाचण्या वाढवल्याने पॉझिटिव्ह रुग्णदेखील जास्त येत आहेत. पण संसर्ग कमी करण्याचा हाच उपाय आहे. गुरुवारी पुन्हा दोन हजार रुग्ण आढळले आहेत. पण पूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १० टक्के होता तो आता ६ टक्क्यांवर आला असून सध्या ९ हजारावर सक्रिय रुग्ण आहेत.

व्यावसायिकांना पॅकेज देण्याचा विचार करू पण शासनच सध्या खूप अडचणीत आहे, केंद्राने राज्याचे थकलेले ३० हजार कोटी रुपये अजून दिलेले नाहीत. कोणती मदत दिलेली नाही, तोक्ते चक्रीवादळ येवून गेल्यावरदेखील मदत दिली नाही दुसरीकडे त्यांनी गुजरातला १ हजार कोटीची मदत केली. केंद्र सरकारदेखील आमची परीक्षा घेत आहे. गेली दीड वर्षे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, आशासेविका असे अनेक घटक न थकता काम करत आहेत. पण परिस्थितीच इतकी वाईट आहे की याचा विचार करुन व्यावसायिकांनी सहकार्य करावे.

---