शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

दुकानदार, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी ...

कोल्हापूर : कोल्हापुरात पॉझिटीव्ह रेट जास्त असल्याने जिल्ह्याचा स्तर ४ मध्ये समावेश आहे, त्यामुळे शहरावरील निर्बंध हटणार नाहीत, व्यापारी व दुकानदारांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे, यावेळीही करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले शुक्रवारी केले. व्यावसायिकांच्या नुकसानीची आम्हाला कल्पना असून काही पॅकेज देता येते का यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

राज्यातील अन्य शहरांमध्ये अनलॉक झाले आहे, मात्र कोल्हापुरात पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यवसायांना दुपारी चारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना घाईघाईने निर्बंध हटवू नका, अशी सूचना केली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र सोमवारपासून आम्ही दुकाने सुरू करणार प्रशासनाने कारवाई केली तरी चालेल असा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभुमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

ते म्हणाले, गेले दीड वर्षे परिस्थिती अतिशय वाईट आहे. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे याची आम्हाला जाणीव आहे. सध्या चाचण्या वाढवल्याने पॉझिटिव्ह रुग्णदेखील जास्त येत आहेत. पण संसर्ग कमी करण्याचा हाच उपाय आहे. गुरुवारी पुन्हा दोन हजार रुग्ण आढळले आहेत. पण पूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १० टक्के होता तो आता ६ टक्क्यांवर आला असून सध्या ९ हजारावर सक्रिय रुग्ण आहेत.

व्यावसायिकांना पॅकेज देण्याचा विचार करू पण शासनच सध्या खूप अडचणीत आहे, केंद्राने राज्याचे थकलेले ३० हजार कोटी रुपये अजून दिलेले नाहीत. कोणती मदत दिलेली नाही, तोक्ते चक्रीवादळ येवून गेल्यावरदेखील मदत दिली नाही दुसरीकडे त्यांनी गुजरातला १ हजार कोटीची मदत केली. केंद्र सरकारदेखील आमची परीक्षा घेत आहे. गेली दीड वर्षे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, आशासेविका असे अनेक घटक न थकता काम करत आहेत. पण परिस्थितीच इतकी वाईट आहे की याचा विचार करुन व्यावसायिकांनी सहकार्य करावे.

---