शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

कोल्हापुरातील गिर्यारोहकाचा चटका लावणारा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : येथील गिर्यारोहकाचा रविवारी मनाला चटका लावणारा मृत्यू झाला. श्रीपाद ऊर्फ मनीष हणमंत जोशी, वंदूरकर (वय ३८), असे ...

कोल्हापूर : येथील गिर्यारोहकाचा रविवारी मनाला चटका लावणारा मृत्यू झाला. श्रीपाद ऊर्फ मनीष हणमंत जोशी, वंदूरकर (वय ३८), असे त्यांचे नाव आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वताची मोहीम पूर्ण झाल्यानंतर माघारी येत असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद हे कोल्हापुरातील देवकर पाणंदमधील वसंत विश्वास पार्कचे रहिवासी होते. ते चांगले क्रिकेट खेळाडू होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे. हणमंत गणेश जोशी यांचे चिरंजीव आणि अ‍ॅड. गोपाळ जोशी यांचे पुतणे होत. रक्षा विसर्जन उद्या, बुधवारी आहे.

श्रीपाद यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी केआयटी कॉलेजमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते परदेशातील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कन्सल्टंट होते. पुण्यातील एका ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून ते गिर्यारोहन करीत होते. त्यांनी कळसूबाई शिखर दोन वेळा सर केले. याचबरोबर आसामसह महाराष्ट्रातील अनेक शिखरावर त्यांनी यशस्वी मोहीम केली. रविवारी (दि. १४) सकाळी त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या मोहिमेसाठी ते घरातून बाहेर पडले. त्यांनी मोहीमही पूर्ण केली. माघारी येताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद यांचा मित्र परिवार मोठा आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्रीपाद यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या मित्र परिवारासह क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

चौकट

श्रीपाद हे उत्कृष्ट क्रिकेटपटू

शाळेमध्ये असल्यापासूनच श्रीपाद यांना क्रिकेटची आवड होती. ते उत्कृष्ट गिर्यारोहकाबरोबरच उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. केआयटी कॉलेजला असताना ते चार वर्षे कॉलेजच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते. कामामुळे बहुतांशी वेळी ते परदेशामध्ये असत. कोरोनाची साथ वाढल्याने काही दिवसांपासून ते कोल्हापुरात आले होते.

फोटो : १५०२२०२१ श्रीपाद जोशी (निधन)