शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शिराळ्याच्या भुईकोटात शिवाजी महाराजांचे चित्रशिल्प

By admin | Updated: March 4, 2017 00:53 IST

किल्ल्यावरील कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे.

विकास शहा --शिराळा --छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून नेताना त्यांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर झाला. मात्र हा किल्ला पूर्ण दुर्लक्षित आहे. यामुळे आता चक्क युवकांनीच स्वनिधीतून या किल्ल्यावरील ऐतिहासिक विहीर स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, विहिरीतून एका भुयारी मार्गाचा शोध लागला आहे. एवढेच नव्हे, तर काही ऐतिहासिक वस्तूही उजेडात आल्या आहेत. भुईकोट किल्ला हे शिराळ्याच्या इतिहासातील एक सुवर्णपानच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली, त्यावेळी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न सरदार आप्पाशास्त्री दीक्षित, सरदार तुलाजी देशमुख, सरदार जोताजी केसरकर, हरबा वडार यांच्यासह ४00 सैनिकांनी केला होता. मात्र सैन्यबल कमी असल्याने हा एकमेव प्रयत्न अयशस्वी झाला होता.सध्या हा भुईकोट किल्ला पूर्ण दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील शिवप्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य गु्रपचे शिवकुमार आवटे, नीलेश आवटे, लालासाहेब शिंदे, प्रमोद पवार, रोहन म्हेत्रे, श्रीराम नांगरे, अण्णा पाटील, दर्शन जोशी, श्रीराम गरगटे, आकाश सपाटे, महेश गवंडी, फत्तेसिंग जोशी, नागेश लोहार आदी युवकांनी या किल्ल्यावरील ऐतिहासिक विहिरीच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे.या विहिरीत जवळजवळ २0 फुटांपर्यंत माती, दगड होते. त्यामुळे या विहिरीतील भुयारी मार्ग कोणालाही दिसत नव्हता. जेव्हा सर्व दगड, माती उपसण्यात आली, तेव्हा हा मार्ग खुला झाला. तसेच मुजलेल्या पायऱ्या, दगडी दिवे, महादेवाच्या पिंडीला अभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे दगडावर कोरलेले चित्रशिल्प, अशा वस्तू सापडल्या आहेत. या विहिरीत खुदाई करताना आणखी काही ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारही काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे.शिराळ्याचा भुईकोट आजवर शासन, पुरातन विभागाकडून दुर्लक्षित राहिला आहे. येथील तुळजाभवानी मंदिर, हनुमान मंदिर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे येऊ न गेल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. या ऐतिहासिक विहिरीची शासनाकडून आणखी संशोधन करून इतिहासकालीन पुरावे शोधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.- जयंतराव देशमुख, शिराळा