शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

करवीरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असेच चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

कोपार्डे : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीसाठी सुरुवात झाली आहे. गटातटांचे राजकारण दिसणार असले तरी आमदार ...

कोपार्डे : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीसाठी सुरुवात झाली आहे. गटातटांचे राजकारण दिसणार असले तरी आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे आता स्थानिक पातळीवर प्रबळ गट असल्याने विधानसभेला जशी शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी ईर्षेने निवडणूक लढली गेली, तशीच लढत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही दिसणार आहे.

करवीर तालुक्यात ज्या ५४ ग्रामपंचायतीचे प्रभाग निश्चित झाले व मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या त्यांत ३० ग्रामपंचायती शहरालगतच्या आहेत. यात प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात बालिंगा, हणमंतवाडी, पाडळी खुर्द, शिये,कोपार्डे, खुपीरे, कुडित्रे, शिये,न्यु वाडदे, हळदी, देवाळे, वडकशिवाले, साबळेवाडी, इस्पुर्ली, गिरगाव, भुयेवाडी, पडवळवाडी, केर्ले, मुडशिंगी, कोगे, सडोली खालसा, निगवे दुमाला, तामगाव या मोठ्या गावांचा समावेश आहे. या गावांत आजही शिवसेना व काँग्रेसचे गट प्रभावी आहेत. समोर जिल्हा बँक, गोकुळ, महानगरपालिका निवडणूक असल्याने या गावात सत्ता स्थापन करून आपली राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी व या निवडणुकीत आपल्याला कोणी आव्हान निर्माण करू नये यासाठी पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके प्रयत्न करणार यात शंका नाही.

पण शहरालगतच्या गावांत आजही शिवसेनेचा प्रभाव असल्याने या गावांवर आपली पकड घट्ट करून पुढील विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके आतापासूनच पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. करवीरमध्ये प्रत्येक गावात काँग्रेसचा गट आहे; पण गेल्या १० वर्षांत आमदार नरके यांनी संपर्क वाढवून निर्माण केलेली तरुण कार्यकर्त्यांची फळी पुन्हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काँग्रेसकडे खेचण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यावेळी विशेषतः शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या गावांत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. राज्य व जिल्हा पातळीवरील निवडणुकांत हीच महाआघाडी भाजपविरोधात एकत्र लढत असल्याचे चित्र पुणे पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीत दिसून आले आहे. पण विधानसभेला करवीरमध्ये शिवसेना व काँग्रेसमध्ये सरळ लढत झाल्याने स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत असे चित्र दिसणार नाही हे निश्चित.

।। चौकट

करवीरमधील सर्वाधिक गावे गोकुळ संघाशी संलग्न आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हीच परिस्थिती आहे. हद्दवाढीत सर्वाधिक गावे करवीरमधील असल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या गावांची मोठी भूमिका असणार असल्याने सर्व राजकीय नेत्यांचे करवीरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होणार आहे.